शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

पॅसेंजर रेल्वे २६ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; प्रवाशांचे सणासुदीत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:34 IST

नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. 

नानासाहेब जठार ।  विसापूर : नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.  मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत. गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी-सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे. या बंद गाड्यात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साईभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेल्या आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अपगाड्या २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो. त्याच गाड्यांवर रेल्वेकडून रेल्वेलाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे. सतत पॅसेंजर गाड्या बंद राहिल्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापास्ूुन दुरावत चालला आहे. दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा, काष्टी, सारोळा, अकोळनेर यासारखी स्थानके ओस पडली आहेत. प्रवासीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत. दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनली आहेत. ऐन सणासुदीत प्रवाशांचे हालमागील वर्षी दसरा व दीपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या. दीपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्ट्या असतात. बाहेर गावी रोजगारासाठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात. ऐन दीपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAhmednagarअहमदनगर