शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पॅसेंजर रेल्वे २६ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; प्रवाशांचे सणासुदीत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:34 IST

नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. 

नानासाहेब जठार ।  विसापूर : नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.  मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत. गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी-सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे. या बंद गाड्यात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साईभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेल्या आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अपगाड्या २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो. त्याच गाड्यांवर रेल्वेकडून रेल्वेलाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे. सतत पॅसेंजर गाड्या बंद राहिल्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापास्ूुन दुरावत चालला आहे. दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा, काष्टी, सारोळा, अकोळनेर यासारखी स्थानके ओस पडली आहेत. प्रवासीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत. दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनली आहेत. ऐन सणासुदीत प्रवाशांचे हालमागील वर्षी दसरा व दीपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या. दीपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्ट्या असतात. बाहेर गावी रोजगारासाठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात. ऐन दीपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAhmednagarअहमदनगर