शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे २६ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; प्रवाशांचे सणासुदीत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:34 IST

नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. 

नानासाहेब जठार ।  विसापूर : नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.  मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत. गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी-सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे. या बंद गाड्यात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साईभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेल्या आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अपगाड्या २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो. त्याच गाड्यांवर रेल्वेकडून रेल्वेलाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे. सतत पॅसेंजर गाड्या बंद राहिल्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापास्ूुन दुरावत चालला आहे. दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा, काष्टी, सारोळा, अकोळनेर यासारखी स्थानके ओस पडली आहेत. प्रवासीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत. दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनली आहेत. ऐन सणासुदीत प्रवाशांचे हालमागील वर्षी दसरा व दीपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या. दीपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्ट्या असतात. बाहेर गावी रोजगारासाठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात. ऐन दीपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAhmednagarअहमदनगर