शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नगरपंचायतीसाठी पारनेरला हालचाली

By admin | Updated: October 30, 2023 12:00 IST

पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे.

पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसात माहिती संकलन होऊन पुढील कार्यवाही होईल.तालुकास्तरावरील गावांमध्ये ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर नगरपंचायतसाठी हरकती मागविण्यात आल्यानंतर पारनेर ग्रामपंचायतीने त्याला हरकत घेऊन सध्या ग्रामपंचायतीचे अस्तित्व ठेवावे, अशी मागणी केली होती. तर राष्टवादीच्या पारनेरमधील युवक नेत्यांनी नगरपंचायतमुळे कर वाढणार असेल तर नगरपंचायत नको, परंतु विकास कामे होणार असतील तर नगरपंचायत करावी, असे म्हटले होते. दरम्यान, पारनेर येथे ग्रामसभा घेण्यात आली. मात्र सभेत गोंधळ झाल्याने निर्णय झाला नाही. परंतु तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपंचायती च्या प्राथमिक हालचाली करताना पारनेर येथील बुगेवाडी, तराळवाडी, कुंभारवाडी, सोबलेवाडी, महाजन मळा, वरखेड मळा यासह परिसरातील वाड्या-वस्त्यांची माहिती मागविली. त्यानुसार किती लोकसंख्या आवश्यक आहे याची माहितीही संकलीत केली. नंतर जिल्हा परिषदेनेही पारनेर येथे नगरपंचायत होण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा माहिती संकलन करताना प्रभागातील जातीनिहाय आरक्षण ठरविण्यासाठी आता गावातील प्रभाग व त्यामधील जातीनिहाय लोकसंख्या मागविली आहे.आरक्षण ठरणारप्रभागनिहाय विविध जातींची लोकसंख्या अहवाल आल्यानंतर नगरपंचायतीचे प्रभाग किती, कोणत्या प्रभागात किती सदस्य व त्यानुसार आरक्षणही तयार करण्यात येणार आहे. सध्या पारनेर ग्रामपंचायतीत सतरा सदस्य संख्या असून सहा प्रभाग आहेत. त्यामुळे नवीन फेररचना कशी होईल, प्रभाग कसे असतील याविषयीची पुढील महिन्यात प्रक्रिया सुरू होणार आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया तीन महिने लांबणीवर पडेल, असे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)सावध प्रतिक्रियापारनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला पारनेर वासीय सावध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल असे म्हणत आहेत. तर नगरपंचायतीमुळे घरपट्टी, पाणीपट्टीत चारपट वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. मात्र काही मोजकी मंडळी सोडल्यास नगरपंचायत होण्यास विरोधही नाही व नगरपंचायत व्हावी म्हणून त्या प्रमाणात समर्थनही नाही अशी सध्याची स्थिती आहे.