शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नगरपंचायतीसाठी पारनेरला हालचाली

By admin | Updated: October 30, 2023 12:00 IST

पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे.

पारनेर : पारनेर येथे नगरपंचायतीच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रभागांमध्ये आरक्षण ठरविण्यासाठी जातीनिहाय लोकसंख्या माहिती मागविली आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसात माहिती संकलन होऊन पुढील कार्यवाही होईल.तालुकास्तरावरील गावांमध्ये ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर नगरपंचायतसाठी हरकती मागविण्यात आल्यानंतर पारनेर ग्रामपंचायतीने त्याला हरकत घेऊन सध्या ग्रामपंचायतीचे अस्तित्व ठेवावे, अशी मागणी केली होती. तर राष्टवादीच्या पारनेरमधील युवक नेत्यांनी नगरपंचायतमुळे कर वाढणार असेल तर नगरपंचायत नको, परंतु विकास कामे होणार असतील तर नगरपंचायत करावी, असे म्हटले होते. दरम्यान, पारनेर येथे ग्रामसभा घेण्यात आली. मात्र सभेत गोंधळ झाल्याने निर्णय झाला नाही. परंतु तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपंचायती च्या प्राथमिक हालचाली करताना पारनेर येथील बुगेवाडी, तराळवाडी, कुंभारवाडी, सोबलेवाडी, महाजन मळा, वरखेड मळा यासह परिसरातील वाड्या-वस्त्यांची माहिती मागविली. त्यानुसार किती लोकसंख्या आवश्यक आहे याची माहितीही संकलीत केली. नंतर जिल्हा परिषदेनेही पारनेर येथे नगरपंचायत होण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा माहिती संकलन करताना प्रभागातील जातीनिहाय आरक्षण ठरविण्यासाठी आता गावातील प्रभाग व त्यामधील जातीनिहाय लोकसंख्या मागविली आहे.आरक्षण ठरणारप्रभागनिहाय विविध जातींची लोकसंख्या अहवाल आल्यानंतर नगरपंचायतीचे प्रभाग किती, कोणत्या प्रभागात किती सदस्य व त्यानुसार आरक्षणही तयार करण्यात येणार आहे. सध्या पारनेर ग्रामपंचायतीत सतरा सदस्य संख्या असून सहा प्रभाग आहेत. त्यामुळे नवीन फेररचना कशी होईल, प्रभाग कसे असतील याविषयीची पुढील महिन्यात प्रक्रिया सुरू होणार आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया तीन महिने लांबणीवर पडेल, असे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)सावध प्रतिक्रियापारनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला पारनेर वासीय सावध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल असे म्हणत आहेत. तर नगरपंचायतीमुळे घरपट्टी, पाणीपट्टीत चारपट वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. मात्र काही मोजकी मंडळी सोडल्यास नगरपंचायत होण्यास विरोधही नाही व नगरपंचायत व्हावी म्हणून त्या प्रमाणात समर्थनही नाही अशी सध्याची स्थिती आहे.