शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

मिडसांगवी येथे सहादू युसूफ शेख, दिलावर बादशहा शेख, शफीक चंदूभाई शेख, जावेद युसूफ शेख व सलीम दादाभाई शेख या ...

मिडसांगवी येथे सहादू युसूफ शेख, दिलावर बादशहा शेख, शफीक चंदूभाई शेख, जावेद युसूफ शेख व सलीम दादाभाई शेख या पशुपालकांनी खुल्या पद्धतीने कुक्कुटपालन केले असून, गेल्या दोन दिवसांत त्यांच्याकडील ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे सोमवारी पाथर्डीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. काही मृत कोंबड्या ताब्यात घेऊन त्या उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगर येथे व नंतर भोपाळ येथील केंद्रीय तपासणी केंद्रात पाठविल्या जाणार आहेत. तपासणीअंती कोंबड्या दगावण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती डॉ. पालवे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची नोंद झाली नसली तरी इतर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या घटना आढळल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सोमवारी पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी. एन. शेळके, पशुसर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यावेळी उपस्थित होते.

....................

जिल्ह्यात १ कोटी १४ लाख कोंबड्या

सध्या जिल्ह्यात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस् असून, त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत. पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाची लक्षणे आढळल्‍यास पशुपालकांनी नजीकच्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. स्थलांतरित पक्षी ज्‍या भागात येतात, त्‍या भागामध्‍ये व्‍यापक सर्वेक्षण मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

-----------

श्रीगोंद्यात कबूतर, कावळ्याचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यात ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर सोमवारीच श्रीगोंदे शहरात एक कबूतर, तर भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे एका कावळ्याचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले असून, ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी दिली.

------------

काही दिवसांपूर्वी आकाशात पृथ्वीच्या पृ्ष्ठभागावर धुमकेतू आदळल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकषर्णाने त्याचे तुकडे झाले. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून, त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीव, प्राणीमात्रांवरही होत आहे. त्यातूनही पक्षी किंवा जनावरे दगावण्याचे प्रकार होत असण्याची शक्यता आहे.

- सुधाकर केदारी, भूगर्भ अभ्यासक