शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यावरील शेतकरी दाम्पत्याने सौरऊर्जेतून फुलविली भातशेती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:18 IST

यशकथा : आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली.

- हेमंत आवारी (अकोले, जि. अहमदनगर)

तालुक्यातील बित्तमगड व विश्रामगड परिसरातील एकदरे आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली. दुर्मिळ अशा ‘काळभात’ गावठी भात वाणाचे त्यांनी जतन केले आहे.‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी विविध योजना राबावल्या जातात. पारंपरिक काळभात, जीरवेल, तांबडा रायभोग, वरंगळ, गरे व हाळी कोळपी, तामकुड, ढऊळ, खडक्या, आंबेमोहर, टाईचन आदी गावरान भात वाण व कडू-गोडा-येरंडी वाल, आबई, चवळी, मिरची, गवार, काटेभेंडी, भोपळा, घोसाळे, नागली, वरई, मसूर, हरभरा, खुरासणी, वाटाणा, घेवडा आदी गावठी वाण जतन संवर्धन करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. जनरल मिल्स पुरस्कृत व बायफच्या उपक्रमांचा शेतकऱ्यांना फायदा होतो. 

एकदरीतच हैबत व हिराबाई भांगरे या आदिवासी कुटुंबाची शेतीची बिकट वाट ‘बायफ’ने सुखकर केली. त्यांचा भात वाणाचा ‘बियाणे कोष’ परिसरात सुपरिचित आहे. १४ प्रकारचे पारंपरिक भात वाण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या घरीच भात संशोधन केंद्र उभारले आहे. या संशोधन केंद्रास लहरी पावसाचा फटका नको म्हणून साडेचार लाख रुपये खर्चून सोलार पॅनल उभारून सौरऊर्जेवर चालणारा शेतीपंप बसविला आहे. 

दुष्काळात साडेतीन ते चार एकर भात शेती डोळ्यासमोर गेली. दोन महिने पाऊस न पडल्याने अक्षरश: सुकून पिवळी होत चालली होती. बायफच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीपंपामुळे हे भात क्षेत्र वाचवता आले. १४ प्रकारचे पारंपरिक भाताचे वाण प्रात्यक्षिक घेतलेले आहे. ते वाचवता आलेले आहे. डिझेल इंजिनने शेतीला पाणी देणे अतिशय खर्चिक आहे. ४ तासांच्या भरणीसाठी अंदाजे हजार ते बाराशे रुपये खर्च येतो, असे हैबत भांगरे सांगतात.

घटते पर्जन्यमान, निसर्गात होणारे बदल, बेभरवशाचा पाऊस या सर्वांचा विचार केल्यास अशी परस्थिती वारंवार येऊ शकते, याचा विचार करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात वापरात आणणे गरजेचे आहे. ‘बायफ’ने सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि होमलाईट सोलर सिस्टिम आदिवासी भागात दिले आहेत. सुमारे अडीच हजार कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. येत्या काळात सौरऊर्जेवर सिंचनाचे मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी सांगितले.