शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आदिवासी पाड्यावरील शेतकरी दाम्पत्याने सौरऊर्जेतून फुलविली भातशेती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:18 IST

यशकथा : आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली.

- हेमंत आवारी (अकोले, जि. अहमदनगर)

तालुक्यातील बित्तमगड व विश्रामगड परिसरातील एकदरे आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली. दुर्मिळ अशा ‘काळभात’ गावठी भात वाणाचे त्यांनी जतन केले आहे.‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी विविध योजना राबावल्या जातात. पारंपरिक काळभात, जीरवेल, तांबडा रायभोग, वरंगळ, गरे व हाळी कोळपी, तामकुड, ढऊळ, खडक्या, आंबेमोहर, टाईचन आदी गावरान भात वाण व कडू-गोडा-येरंडी वाल, आबई, चवळी, मिरची, गवार, काटेभेंडी, भोपळा, घोसाळे, नागली, वरई, मसूर, हरभरा, खुरासणी, वाटाणा, घेवडा आदी गावठी वाण जतन संवर्धन करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. जनरल मिल्स पुरस्कृत व बायफच्या उपक्रमांचा शेतकऱ्यांना फायदा होतो. 

एकदरीतच हैबत व हिराबाई भांगरे या आदिवासी कुटुंबाची शेतीची बिकट वाट ‘बायफ’ने सुखकर केली. त्यांचा भात वाणाचा ‘बियाणे कोष’ परिसरात सुपरिचित आहे. १४ प्रकारचे पारंपरिक भात वाण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या घरीच भात संशोधन केंद्र उभारले आहे. या संशोधन केंद्रास लहरी पावसाचा फटका नको म्हणून साडेचार लाख रुपये खर्चून सोलार पॅनल उभारून सौरऊर्जेवर चालणारा शेतीपंप बसविला आहे. 

दुष्काळात साडेतीन ते चार एकर भात शेती डोळ्यासमोर गेली. दोन महिने पाऊस न पडल्याने अक्षरश: सुकून पिवळी होत चालली होती. बायफच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीपंपामुळे हे भात क्षेत्र वाचवता आले. १४ प्रकारचे पारंपरिक भाताचे वाण प्रात्यक्षिक घेतलेले आहे. ते वाचवता आलेले आहे. डिझेल इंजिनने शेतीला पाणी देणे अतिशय खर्चिक आहे. ४ तासांच्या भरणीसाठी अंदाजे हजार ते बाराशे रुपये खर्च येतो, असे हैबत भांगरे सांगतात.

घटते पर्जन्यमान, निसर्गात होणारे बदल, बेभरवशाचा पाऊस या सर्वांचा विचार केल्यास अशी परस्थिती वारंवार येऊ शकते, याचा विचार करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात वापरात आणणे गरजेचे आहे. ‘बायफ’ने सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि होमलाईट सोलर सिस्टिम आदिवासी भागात दिले आहेत. सुमारे अडीच हजार कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. येत्या काळात सौरऊर्जेवर सिंचनाचे मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी सांगितले.