शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यावरील शेतकरी दाम्पत्याने सौरऊर्जेतून फुलविली भातशेती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:18 IST

यशकथा : आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली.

- हेमंत आवारी (अकोले, जि. अहमदनगर)

तालुक्यातील बित्तमगड व विश्रामगड परिसरातील एकदरे आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली. दुर्मिळ अशा ‘काळभात’ गावठी भात वाणाचे त्यांनी जतन केले आहे.‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी विविध योजना राबावल्या जातात. पारंपरिक काळभात, जीरवेल, तांबडा रायभोग, वरंगळ, गरे व हाळी कोळपी, तामकुड, ढऊळ, खडक्या, आंबेमोहर, टाईचन आदी गावरान भात वाण व कडू-गोडा-येरंडी वाल, आबई, चवळी, मिरची, गवार, काटेभेंडी, भोपळा, घोसाळे, नागली, वरई, मसूर, हरभरा, खुरासणी, वाटाणा, घेवडा आदी गावठी वाण जतन संवर्धन करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. जनरल मिल्स पुरस्कृत व बायफच्या उपक्रमांचा शेतकऱ्यांना फायदा होतो. 

एकदरीतच हैबत व हिराबाई भांगरे या आदिवासी कुटुंबाची शेतीची बिकट वाट ‘बायफ’ने सुखकर केली. त्यांचा भात वाणाचा ‘बियाणे कोष’ परिसरात सुपरिचित आहे. १४ प्रकारचे पारंपरिक भात वाण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या घरीच भात संशोधन केंद्र उभारले आहे. या संशोधन केंद्रास लहरी पावसाचा फटका नको म्हणून साडेचार लाख रुपये खर्चून सोलार पॅनल उभारून सौरऊर्जेवर चालणारा शेतीपंप बसविला आहे. 

दुष्काळात साडेतीन ते चार एकर भात शेती डोळ्यासमोर गेली. दोन महिने पाऊस न पडल्याने अक्षरश: सुकून पिवळी होत चालली होती. बायफच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीपंपामुळे हे भात क्षेत्र वाचवता आले. १४ प्रकारचे पारंपरिक भाताचे वाण प्रात्यक्षिक घेतलेले आहे. ते वाचवता आलेले आहे. डिझेल इंजिनने शेतीला पाणी देणे अतिशय खर्चिक आहे. ४ तासांच्या भरणीसाठी अंदाजे हजार ते बाराशे रुपये खर्च येतो, असे हैबत भांगरे सांगतात.

घटते पर्जन्यमान, निसर्गात होणारे बदल, बेभरवशाचा पाऊस या सर्वांचा विचार केल्यास अशी परस्थिती वारंवार येऊ शकते, याचा विचार करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात वापरात आणणे गरजेचे आहे. ‘बायफ’ने सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि होमलाईट सोलर सिस्टिम आदिवासी भागात दिले आहेत. सुमारे अडीच हजार कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. येत्या काळात सौरऊर्जेवर सिंचनाचे मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी सांगितले.