शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

..अन्यथा महावितरणवर आसूड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:26 IST

चिचोंडी पाटील : महावितरणकडून नगर तालुक्यातील जनतेची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी, अन्यथा भाजप नगर तालुक्याच्या ...

चिचोंडी पाटील : महावितरणकडून नगर तालुक्यातील जनतेची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी, अन्यथा भाजप नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी दिले.

कोकाटे म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालविली आहे. एखादे रोहित्र जळाले की शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरा तरच ते बदलून दिले जाईल, असे सांगून अडकवून ठेवले जाते. कोरोनासारख्या परिस्थितीमध्येही सर्व आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असताना महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

सांडवा, पिंपळगाव लांडगा, जेऊर परिसरातील रोहित गेल्या २-३ महिन्यांपासून जळालेले असतानाही अद्यापपर्यंत ते बदलून भेटलेले नाहीत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजप नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे. परंतु, महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी. अन्यथा, भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते रभाजी सूळ, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, बापूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बापूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

190821\img-20210819-wa0155.jpg

नगर तालुक्यातील वीज्र समस्या निवारण करा अन्यथा आसुड मोर्चा चा इशार भाजपा तालुका ने दिला