अहमदनगर : कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व व त्यांच्या राशींमधील गमतीजमती यावर आधारीत ज्योतिषाचार्य अरविंद पांडे यांच्या ‘राशी कवच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मणीनारायण मंगल कार्यालय,टिळक रोड, अहमदनगर येथे दि.१२ जून २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने तीनही काळांचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढे पण करायच्या नाही असे ठरविणारा प्रत्येक व्यक्ती तीनही काळाचा विचार करीत असतो. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा प्रभाव पडतो. हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना नवीन विषय घेऊन गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या भेटीला येत आहे. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी कार्यक्रमाची प्रस्तुती होणार तर आहेच पण कुटुंबासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय राशीकवच या कार्यक्रमाद्वारे रसिकांपर्यंत साद घालण्याचे कार्य या निमित्ताने होणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’तर्फे आज ‘राशी कवच’ चे आयोजन
By admin | Updated: June 11, 2016 23:47 IST