शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर ...

या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर हटविण्यात आले आहे. जास्त पावसाबरोबर आर्द्रतेचा ही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांशी तालुके पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त व कमी पावसाचे आहे. डाळिंब फळबागांच्या नवीन पीक विमा प्रस्तावात १५ जुलै ते १५ डिसेंबर दरम्यान जास्त पाऊस व आर्द्रतेचा तीन ट्रिगर करण्यात आल्या आहेत. यामध्ये किमान परतावा मिळण्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदिन २५ मिमी. पाऊस पडणे आवश्यक आहे. दैनंदिन आर्द्रता ही ८५ टक्क्यांच्या पुढे नोंदली जाणे आवश्यक आहे. म्हणजेच या पाच दिवसात सव्वाशे मिमी. पाऊस होणे आवश्यक आहे. तसेच या पावसाचा दैनिक कालावधी वाढत गेल्यास नुकसान भरपाई सुद्धा वाढणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत तरी कोणत्याही तालुक्यात सलग पाच दिवस २५ मिमी. पेक्षा जास्त पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विम्याच्या परताव्याचे भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे. फळबाग पीक विमा योजनेचे परतावे अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी मिळतील याचीही शक्यताही आता धूसर आहे. केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याची या निमित्ताने समोर आहे.

जुन्या फळबाग विमा योजनेत १५ जुलै ते १५ ऑगस्ट फळधारणा काळ तसेच १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर फळवाढीचा काळ या कालावधीत पावसाचा खंड व कमी पाऊस या ट्रिगरचा समावेश होता. त्यामुळे या दुष्काळी व कमी पावसाच्या भागातील फळबागा या अडीच महिन्यात कमी पावसाच्या ट्रिगरमध्ये पात्र होत होत्या. मात्र सुधारित फळबाग योजनेत कमी पावसाचा ट्रिगर काढल्याने शेतकऱ्यांना फळबागांच्या पीक विम्याचे परतावे मिळणे आता अशक्य आहे. फळबाग पीक विमा योजना अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना मिळतील याची शक्यता नाही, केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याचे यातून स्पष्ट आहे.

...............

जुनी पीक विमा योजना...

टप्पा १- कमी पाऊस. फळधारणा कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट.

टप्पा २ कमी पाऊस फळवाढ कालावधी १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर.

टप्पा ३- जास्त पाऊस फळ पक्व ते फळ काढणी १६ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर. वरील योजनेत कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना टप्पा एक दोनमध्ये परतावे मिळत होते.

............

यावर्षी परत येणार जुनी पीक विमा योजना...

२०२०-२०२१ मध्ये शासनाने फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलविले होते,हे ट्रिगर क्लिष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही विमा परतावे मिळाले नाही. मात्र चालू वर्षापासून शासनाने २०१९-२०२० पूर्वीचेच ट्रिगर लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.त्यामुळे पुढील वर्षापासून पीक विमा मिळण्याच्या शक्यता तयार झाली आहे.