शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

तंबाखूमुळे तरुणांना घेरलंय तोंडाच्या कॅन्सरने; रुग्णांच्या टक्केवारीत ४३ टक्के रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:31 IST

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात. 

विशेष मुलाखत / साहेबराव नरसाळे । अहमदनगर : कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात.  यात तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण ४१़५ टक्क्यांपर्यंत असल्याचे डॉ़. रत्ना चव्हाण- नजन सांगतात.  प्रश्न : तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारण ठरते का? उत्तर : कर्करोगाचे विविध प्रकार पडतात. त्यातील मौखिक कर्करोग हा अधिक गंभीर मानला जातो़. त्याचे कारण मौखिक कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो आणि त्याचेच प्रमाण अधिक आहे़. त्यामुळे भारतात तरी ही समस्या अधिक गंभीर आहे. ४१़५ टक्के कर्करोग हा तंबाखूमुळे होतो़. म्हणजे जे कोणी म्हणत असतात ना की तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, त्यांनी ही आकडेवारी गांभीर्याने पहायला हवी़. या आकडेवारीवरुन तरी तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे, असे दिसते़.  प्रश्न : मौखिक कर्करोगाची कारणे काय आहेत? उत्तर : तंबाखू, कात, पान मसाला, गुटखा, धुम्रपान, रासायनिक पदार्थांचे अतिरिक्त सेवन ही मौखिक कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. तोंडातील चट्ट्यांच्या प्रकारावरुन मौखिक कर्करोगाचे निदान करता येते़. तोंडामध्ये ज्या ठिकाणी तंबाखू ठेवली जाते, तेथे हा चट्टा आढळतो. त्याला ल्युकोप्लेकिया असं संबोधतात. गडद लाल रंगाचा वेलवेटसारखा चट्ट्याला इरिथोप्लेकिया म्हणतात. काही चट्टे सफेद, समांतर रेषांसारखे दिसतात. तोंडात चट्टे आल्यानंतर तिखट, मसालेदार पदार्थ सहन न होणे, तोंडाचा दाह होणे, जीभ व टाळूवर फोड येणे, तोंडाची लवचिकता कमी होणे, गालाच्या आतील बाजूला पांढरट, जाडसर पट्टे बनतात. यामुळे तोंड पूर्णपणे उघडत नाही.  कृत्रिम रंगही कॅन्सरला कारक ?आज अनेकजण अन्नाला विशिष्ट रंग यावा, यासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. हा कृत्रिम रंगही तोंडाच्या कॅन्सरला निमंत्रण ठरु शकतो. त्याशिवाय रासायनिक घटक असलेले पदार्थ, शीतपेये, फास्टफूड, प्लास्टिक पॅकेटमधील पदार्थ खाणे टाळले पाहिजे़. उपाय काय ?मौखिक कर्करोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा़ प्राथमिक चाचण्या, बायोप्सी, लॅब टेस्ट करुन घ्या. कॅन्सरचे निदान झाल्यास पुढील उपचार सुरु करता येतात. दिवसात २-३ लिटर पाणी प्यावे़. भरपूर फळे, पालेभाज्या खाव्यात व व्यायाम करावा. जेवणाच्या वेळा पाळाव्यात़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcancerकर्करोगinterviewमुलाखतdoctorडॉक्टर