शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद का?

By admin | Updated: September 20, 2015 00:50 IST

विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचे तोंड कोणी बंद केले? याबाबत ते का गप्प आहेत? असा सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.

श्रीरामपूर : समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना मंत्रिमंडळात असूनही त्याविषयी गप्प बसणारे व आता स्वत:च्या मतदार संघावर तसेच अहमदनगर जिल्ह्णावर जलसंपदा विभागाच्या गोदावरी खोऱ्याच्या जलआराखड्याने जलसंकट आले असताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचे तोंड कोणी बंद केले? याबाबत ते का गप्प आहेत? असा सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला. अशोक सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. ‘२००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा होताना श्रीरामपूरचे तत्कालिन आमदार जयंत ससाणे यांनी विधानसभेत झोपा काढल्या. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यामुळे श्रीरामपूरचे ब्लॉकचे व शेती महामंडळाचे पाणी वरच्या भागाने पळविले. अगोदर झोपा काढणारे ससाणे, कांबळे आता जलआराखड्याबाबत हरकती घेण्याचे आवाहन करीत आहेत. गेल्या १५ वर्षातील त्यांच्या दळभद्री नेतृत्वामुळे श्रीरामपूर तालुक्याचे हक्काचे पाणी जायकवाडीत जाऊन तालुक्याचे वाळवंटे बनले आहे. ससाणे-कांबळेंमध्ये दम असेल तर त्यांनी हा कायदा रद्द करून दाखवावा’ असे आव्हान देऊन मुरकुटे म्हणाले.आमदाराचा निधी कुठे जातो? याचा जाब जनतेने आमदार, खासदारांना विचारला पाहिजे. इतर कारखान्याच्या शिक्षण व अन्य संस्था तेथील पुढाऱ्यांनी खाजगी मालकीच्या केल्या असल्या तरी अशोक कारखान्याशी सर्व संलग्न संस्था कारखाना सभासदांच्या मालकीच्या आहेत. जास्त भाव दिला म्हणून संगमनेर, प्रवरा कारखान्याच्या अभिनंदनाचे फलक लावणाऱ्यांनी आता ‘अशोक’च्या अभिनंदनाचा फलक लावायची दानत दाखविली नाही. दोन कारखाने दरवर्षी इकडून तिकडून कच्चा ऊस गाळूनही १२ टक्के साखर उतारा कसा घेतात? याचा शेतकरी संघटनेने अभ्यास करावा, असा सल्लाही मुरकुटे यांनी दिला. प्रतापराव भोसले, जितेंद्र भोसले, बाळासाहेब पटारे, गोरख ताके, दत्तात्रय जगताप, मच्छिंद्र येळे, विठ्ठल राऊत, नामदेव बडाख, अ‍ॅड. भणगे यांनी विविध सूचना केल्या. काही सभासदांना ऊस उत्पादकता पुरस्काराने गौरविण्यात आले. सुरेश गलांडे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गोरक्षनाथ पारखे, के. वाय. बनकर, जि.प. सभापती शरद नवले, इंद्रनाथ थोरात, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, अर्चना पानसरे, सुनीता गायकवाड, माजी नगरसेवक सलीम शेख, महंमद शेख, विजय शिंदे, गणेश राठी आदी हजर होते. (प्रतिनिधी)