शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

गैरहजर उमेद्वारांना शेवटच्या दिवशी मिळणार संधी

By admin | Updated: June 10, 2014 00:13 IST

अहमदनगर : पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी निम्म्या उमेदवारांनी दांडी मारली होती. काही कारणांमुळे ते येऊ शकले नव्हते. ज्यांनी अर्ज केलेले आहेत,

अहमदनगर : पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी निम्म्या उमेदवारांनी दांडी मारली होती. काही कारणांमुळे ते येऊ शकले नव्हते. ज्यांनी अर्ज केलेले आहेत, मात्र पहिल्या दिवशी हजर राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी अर्जाद्वारे विनंती केल्यास त्यांना पुन्हा भरती प्रक्रियेत चाचण्या देण्याची शेवटच्या दिवशी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्राथमिक पातळीवर विचार सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यातील १७९ जागांसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रत्येक दिवशी दीड हजार उमेद्वारांना बोलविण्यात आले आहे. पहिल्या दिवशी निम्मे उमेदवार गैरहजर होते. काही कारणामुळे त्यांना पहिल्या दिवशी येता आले नाही. मात्र त्यांनी अर्ज केल्यास त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. एक-दोन किरकोळ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या तक्रारींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निवारण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेचा तिसरा दिवस सोमवारी पार पडला. यामध्ये दीड हजार उमेदवारांपैकी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली. त्यामधून मैदानी चाचण्यांमध्ये ९३० उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. (प्रतिनिधी)

पन्नास टक्के प्रक्रिया संपलीएकूण सहा दिवसांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नऊ हजार उमेदवारांना सहा दिवसांमध्ये विभागण्यात आले आहे. सोमवारी तीन दिवस पूर्ण झाले. त्यामुळे साडेचार हजार उमेद्वारांसाठी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया संपली आहे. आता मंगळवारपासून तीन दिवस प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तीन दिवसांमध्ये साडे चार हजार उमेदवारांपैकी २ हजार ९८१ उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामुळे पहिल्या दिवसानंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे.