शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विरोधकांना साकळाई पाणी योजनाच माहित नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:06 IST

तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़

अहमदनगर : तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़ त्यांनीच तालुक्यात येऊन पाणी योजनेबाबत बोलावे, असा अग्रह होता़ आता मुख्यमंत्रीच वाळकीत येत असून, त्यांच्या समोर सकाळाई पाणी योजनेचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी वाळकी येथे शनिवारी झालेल्या सभेत दिले़महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाळकी येथे मंगळवारी (दि. १६)होत असलेल्या सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी माजीमंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, दीपक कार्ले, नगरसेवक योगिराज गाडे, रवींद्र कडूस, रवींद्र भापकर, शरद बोठे, रमाकांत बोठे, प्रवीण कोकाटे, मनोज कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांना साकळाई पाणी योजनेचा प्रश्नच माहिती नाही, या राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले़ ते म्हणाले, की तालुक्यातील साकळाई पाणी योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या योजनेतील अडथळा त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता़ त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. पण, विरोधी उमेदवार साकळाई योजना पूर्णपणे मार्गी लागली असून, यावर आता फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगत आहेत. नेमकी वस्तुस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांसह या तालुक्यातील सामान्य माणसाला कळली पाहिजे, आणि मुख्यमंत्र्यांनीच साकळाई योजनेबाबत तालुक्यात येऊन भाष्य करावे, असा आग्रह आपला होता. मुख्यमंत्र्यांनी सभेस येण्याचे मान्य केल्यामुळे साकळाई योजनेबाबता मुख्यमंत्री बोलतील, असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला़पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार- पाचपुतेश्रीगोंदा तालुक्याची औद्योगिक वसाहत असेल किंवा या भागाच्या प्रलंबित पाणी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले़ ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्यात आता डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभेनंतर आता मुख्यमंत्र्यांची सभा महायुतीच्या प्रचारासाठी निर्णायक ठरेल असे पाचपुते म्हणाले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019