शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

...तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

संगमनेर : राज्यातील सहकारी बँकांमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. बँकांच्या कर्जवसुलीसाठी प्रयत्न ...

संगमनेर : राज्यातील सहकारी बँकांमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. बँकांच्या कर्जवसुलीसाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येक सभासदाचे काम आहे. कर्जवसुली झाली तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील, असे कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (दि. २०) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, उद्योजक राजेश मालपाणी, साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, साहेबराव गडाख, संपत डोंगरे, विष्णुपंत रहाटळ, चंद्रकांत कडलग, राजेंद्र गुंजाळ, रमेश गुंजाळ, सुलभा दिघे, सुनीता अभंग, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, बँकेचे शाखाधिकारी रमेश थोरात, आदी उपस्थित होते.

अमृतवाहिनी बँकेने आर्थिक शिस्त कायम जपली आहे. या बँकेवर सभासद व नागरिकांचा मोठा विश्वास असून बँकेमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. कोरोना संकटामुळे कर्जदारांकडे बँकांची कर्जे बाकी आहेत. मात्र, आता प्रत्येकाने थोडे-थोडे करीत थकबाकी नियमित केली पाहिजे, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.

नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे संचालक सुभाष गुंजाळ, गोरक्षनाथ सोनवणे, निसार शेख, नानासाहेब शिंदे, आर. बी. रहाणे, बापूसाहेब गिरी, बाळासाहेब फड, लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, रोहिदास पवार, बाळासाहेब उंबरकर, शंकरराव ढमक, लक्ष्मण वाघ यावेळी उपस्थित होते.

----------