शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

आश्रमशाळा शिक्षकांना फक्त ७५ रुपये रोजंदारी

By admin | Updated: June 26, 2014 00:42 IST

अहमदनगर : आदिवासी विकास आश्रमशाळांमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या १५ रुपये तासिका तत्वावर काम करीत आहेत़

अहमदनगर : आदिवासी विकास आश्रमशाळांमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या १५ रुपये तासिका तत्वावर काम करीत आहेत़ या रोजंदारीवरील शिक्षकांना कायम करावे, या मागणीसाठी न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना आता राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी टी़ एम़ पिचड यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे़ आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात २५ शासनमान्य आश्रमशाळा आहेत़ या आश्रमशाळांमध्ये सुमारे १८०० कर्मचारी कार्यरत आहेत़ हे कर्मचारी रोजंदारी व तासिका तत्वावर नेमण्यात आले आहेत़ रोजंदारी किंवा तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना गेल्या दहा वर्षापासून तासाचे अवघे १५ रुपये मानधन दिले जाते़ त्यानुसार या शिक्षकांना दिवसाचा ७५ रुपये रोज दिला जातो़ रोजंदारीवरील शिक्षकांना कायम करावे, या मागणीसाठी उपोषणे, मोर्चा, धरणे, अन्न त्याग अशी आंदोलने करुन या शिक्षकांनी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला़ मात्र, आदिवासी विकास विभागाने या शिक्षकांना प्रत्येकवेळी आश्वासने दिली़ दिंडोरीचे (नाशिक) आमदार धनराज महाले यांनी २९ मार्च २०१२ रोजी झालेल्या प्रधान सचिवांच्या बैठकीत आदिवासी विकास विभागातील तासिका शिक्षकांना कायम करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता़ या बैठकीत प्रधान सचिवांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आदिवासी विभागाच्या आयुक्तांना दिले होते़ मात्र, कार्यवाही झाली नाही़ ३१ मे २०१२ रोजी आदिवासी विकास आयुक्तालयाने शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी व तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव मागविले होते़ व त्यासाठी ५ जून २०१२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती़ मात्र, या बैठकीतही प्रस्ताव सादर केले नाही़ त्यानंतर २ जानेवारी व १३ जानेवारी, ७ मार्च व १४ मार्च २०१४ रोजी पुन्हा प्रस्ताव मागविले़ मात्र, त्यावर कार्यवाही न करता आदिवासी विकास विभागाने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली़ त्यामुळे या शिक्षकांनी सरकारच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ जुन्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय भरती करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ रोजंदारीवरील शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे या शिक्षकांना चक्क कामावरुनच कमी करण्याचा अजब न्याय आदिवासी विकास विभागाच्या राजूर प्रकल्पाने घेतला़ त्यामुळे ४१ शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ कोणत्याही कर्मचाऱ्यास किमान १६२ रुपये रोजंदारी द्यावी, हा सरकारचा नियमही राजूर प्रकल्पाने पायदळी तुडविला आहे़ (प्रतिनिधी)पिचड यांच्याकडून अपेक्षा तत्कालीन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांना आ़ मधुकरराव पिचड यांनी २७ मार्च २०१३ रोजी आश्रमशाळा शिक्षकांना कायम करण्याबाबत पत्र पाठविले होते़ या पत्रात पिचड यांनी म्हटले होते की, आश्रमशाळांमधील रोजंदारी व तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर झाला आहे़ या शिक्षकांनी आदिवासी विभागात मोलाचे योगदान दिले आहे़ त्यामुळे या शिक्षकांना कायम करण्यास हरकत नाही़ त्यावेळी मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते़ आता मधुकरराव पिचड हे आदिवासी विकासमंत्री आहेत़ त्यामुळे पिचड हे या शिक्षकांना कायम करतील, अशी अपेक्षा आदिवासी विकास आश्रमशाळा रोजंदारी शिक्षक व कर्मचारी संघटनेकडून व्यक्त होत आहे़विधान परिषदेच्या अधिवेशनात आ़ विनोद तावडे, रामनाथ मोते आदींनी शासकीय आश्रमशाळातील तासिका शिक्षकांच्या वेठबिगारीबाबत प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर तत्कालीन आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी या शिक्षकांना कायम करण्याचा प्रस्ताव कार्यवाहीत असल्याचे सांगितले होते़ मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही़रोजंदारीवरील शिक्षकांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे़ त्यामुळे ४१ कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे़ त्यांना पुन्हा कामावर घ्यायचे की नाही, याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे मार्गदर्शन मागविले आहे़ - डॉ़ टी़ एम़ पिचड, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासीविकास प्रकल्प, राजूर