शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नामांकित कंपनीचे कांदा बियाणे आढळले सदोष; तक्रार निवारण समितीचा अहवाल

By शिवाजी पवार | Updated: January 3, 2024 15:30 IST

शेतकऱ्याची पोलिसांत धाव

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : यावर्षीच्या रब्बी हंगामात नामांकित कंपनीच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आले. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

 संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात  कांदा  बियाणांची  उगवण झाली  नाही.  त्यानंतर  त्यांनी  याविरूद्ध  लढाई लढली. जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपनीच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.       शेतकरी जगताप यांनी सहा किलो कांदा बियाणांची १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये येथील एकाकृषी केंद्रातून खरेदी  केली होती. बियाणे खरेदीचे बिल त्यांनी केंद्राकडून घेतले. कारेगाव  येथील  शेतात  १०  नोव्हेंबरला  त्यांनी बियाणांची पेरणी केली. मात्र, २० वीस दिवस उलटूनही बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर जगताप यांनी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी हे  समितीचे कामकाज पाहतात.  

समितीने शेतात बियाणांची पाहणी केली. त्यानंतर बाभळेश्वर (ता.राहाता) येथील पायरेन्सचे डॉ. व्ही.एस. घुले, तंत्र अधिकारी अमोल काळे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, अजित आनंद, डी.आर. गागरे, तसेच शेतकरी भाऊसाहेब जगताप, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र कुलकर्णी यांच्या समोर पंचनामा करण्यात आला. त्यात कंपनीचे बियाणे सदोष आढळून आले. 

शेतकऱ्याच्या जमिनीवर कांद्याची केवळ पंधरा ते वीस टक्के उगवण झाल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल देण्यात तक्रार निवारण समितीने दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने  जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.