शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

नामांकित कंपनीचे कांदा बियाणे आढळले सदोष; तक्रार निवारण समितीचा अहवाल

By शिवाजी पवार | Updated: January 3, 2024 15:30 IST

शेतकऱ्याची पोलिसांत धाव

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : यावर्षीच्या रब्बी हंगामात नामांकित कंपनीच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आले. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

 संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात  कांदा  बियाणांची  उगवण झाली  नाही.  त्यानंतर  त्यांनी  याविरूद्ध  लढाई लढली. जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपनीच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.       शेतकरी जगताप यांनी सहा किलो कांदा बियाणांची १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये येथील एकाकृषी केंद्रातून खरेदी  केली होती. बियाणे खरेदीचे बिल त्यांनी केंद्राकडून घेतले. कारेगाव  येथील  शेतात  १०  नोव्हेंबरला  त्यांनी बियाणांची पेरणी केली. मात्र, २० वीस दिवस उलटूनही बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर जगताप यांनी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी हे  समितीचे कामकाज पाहतात.  

समितीने शेतात बियाणांची पाहणी केली. त्यानंतर बाभळेश्वर (ता.राहाता) येथील पायरेन्सचे डॉ. व्ही.एस. घुले, तंत्र अधिकारी अमोल काळे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, अजित आनंद, डी.आर. गागरे, तसेच शेतकरी भाऊसाहेब जगताप, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र कुलकर्णी यांच्या समोर पंचनामा करण्यात आला. त्यात कंपनीचे बियाणे सदोष आढळून आले. 

शेतकऱ्याच्या जमिनीवर कांद्याची केवळ पंधरा ते वीस टक्के उगवण झाल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल देण्यात तक्रार निवारण समितीने दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने  जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.