शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

नामांकित कंपनीचे कांदा बियाणे आढळले सदोष; तक्रार निवारण समितीचा अहवाल

By शिवाजी पवार | Updated: January 3, 2024 15:30 IST

शेतकऱ्याची पोलिसांत धाव

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : यावर्षीच्या रब्बी हंगामात नामांकित कंपनीच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आले. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

 संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात  कांदा  बियाणांची  उगवण झाली  नाही.  त्यानंतर  त्यांनी  याविरूद्ध  लढाई लढली. जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपनीच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.       शेतकरी जगताप यांनी सहा किलो कांदा बियाणांची १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये येथील एकाकृषी केंद्रातून खरेदी  केली होती. बियाणे खरेदीचे बिल त्यांनी केंद्राकडून घेतले. कारेगाव  येथील  शेतात  १०  नोव्हेंबरला  त्यांनी बियाणांची पेरणी केली. मात्र, २० वीस दिवस उलटूनही बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर जगताप यांनी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी हे  समितीचे कामकाज पाहतात.  

समितीने शेतात बियाणांची पाहणी केली. त्यानंतर बाभळेश्वर (ता.राहाता) येथील पायरेन्सचे डॉ. व्ही.एस. घुले, तंत्र अधिकारी अमोल काळे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, अजित आनंद, डी.आर. गागरे, तसेच शेतकरी भाऊसाहेब जगताप, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र कुलकर्णी यांच्या समोर पंचनामा करण्यात आला. त्यात कंपनीचे बियाणे सदोष आढळून आले. 

शेतकऱ्याच्या जमिनीवर कांद्याची केवळ पंधरा ते वीस टक्के उगवण झाल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल देण्यात तक्रार निवारण समितीने दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने  जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.