शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची गोणी परत मिळेना व पैसेही नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:55 IST

शेतकºयांच्या कल्याणासाठी बाजार समित्या सुरु झाल्या़ मात्र, बाजार समित्या आज खरोखर शेतकºयांच्या पाठीशी आहेत का?  शेतकरी हिताय हा उद्देश सोडून आता अनेक बाजार समित्याही ‘व्यापारी हिताय’ काम करु लागल्याचे दिसत आहे़ बाजार समित्यांचे संचालक शेतकरी हिताचे कोणते मुद्दे पुढे रेटतात? नेते याबाबत का बोलत नाहीत? बाजार समिती नक्की कुणाची ? ही लेखमाला वाचा आजपासून.

शिवाजी पवार श्रीरामपूर : बाजार समितीच्या अधिनियमानुसार समितीच्या आवारात फक्त शेतमालाची विक्री होते. त्यात पॅकिंग मटेरिअलची किंमत धरली जात नाही. त्यामुळे फळे व भाजीपाला विकल्यानंतर क्रेट, कंटेनर व पोती शेतकºयांना परत करायला हवीत. मात्र, नगर जिल्ह्यातील बहुतेक    बाजार समित्यांमध्ये कांदा गोण्या शेतकºयांना कधीही परत केल्या जात नाहीत. किंवा त्यापोटीचे शुल्कही दिले जात नाही. याची थेट झळ   अनेक वर्षांपासून शेतकºयांना बसत आहे. 

शेतकºयांच्या पिकांना दर मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होतेच. मात्र, बाजार समित्यांमध्येही विविध कारणांखाली शेतकºयांची आर्थिक लूट सुरु आहे. कांदा विक्रीमध्ये शेतकरी गोणीत कांदा भरुन बाजार समितीत आणतात. कांदा गोणी शेतकरी विकत घेतात. 

बारदानाची गोण असेल तर एका गोणीसाठी त्यांना सुमारे ३५ ते ४० रुपये मोजावे लागतात. एका गोणीत साधारण ५० ते ५५ किलो कांदा बसतो. म्हणजे एक क्विंटल कांद्यासाठी ४० रुपयांची गोण घेतली तर शेतकºयांना आठ हजार रुपये खर्च होतो. काही बाजार समित्यांमध्ये प्लास्टिकची गोण चालते. ही गोण १० ते बारा रुपयांत पडते. मात्र, या गोणीत कांदा नेला की व्यापारी घट पकडतात. कारण या गोणीत कांदा खराब होतो, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांनी नेलेल्या गोणीतच व्यापारी कांदा पुढे पाठवितात. म्हणजे व्यापाºयाला कांदा गोणीसाठी खर्च येत नाही. मात्र, या गोणीचे पैसे व्यापारी शेतकºयाला परत करत नाहीत. विद्यापीठ व शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा लागवड व काढणी यापोटीचा उत्पादन खर्च हा क्विंटलमागे सुमारे ४००  रुपये आहे. त्यानंतर कांदा बाजार समितीत नेताना क्विंटलमागे एकरी १०० ते १२० रुपये खर्च येतो. म्हणजे प्रती क्विटंल शेतकºयाचा खर्च हा ५०० ते ५२० रुपये जातो. मात्र, श्रीरामपूर बाजार समितीत सोमवारी शेतकºयांना सरासरी ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. म्हणजे शेतकºयांना जवळपास मुद्दल किमतीत कांदा विकावा लागला. --कृषी उत्पन्न बाजार समिती नियम अधिनियम १९६३ नुसार समितीच्या आवारात शेतीमालाची ठरणारी किंमत ही केवळ मालाची असते. त्यात पॅकिंग मटेरियलचा खर्च धरला जात नाही. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांची विक्री केल्यानंतर क्रेट, कंटेनर किंवा पोती शेतकºयांना परत  केली जातात. मात्र कांद्याच्या बाबतीत असे घडत नाही.  --------------

पूर्वी राज्य सरकारने कांदा गोणीचे पैसे व्यापाºयांनी शेतकºयांना द्यावेत असा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारने पुन्हा त्यास स्थगिती दिली. व्यापाºयांचे म्हणणे असे आहे की आम्ही पुढे ज्या व्यापाºयांना माल पाठवितो तेही आम्हास पैसे देत नाही. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. - किशोर काळे,  सचिव बाजार समिती श्रीरामपूर