शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

कांद्याची गोणी परत मिळेना व पैसेही नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:55 IST

शेतकºयांच्या कल्याणासाठी बाजार समित्या सुरु झाल्या़ मात्र, बाजार समित्या आज खरोखर शेतकºयांच्या पाठीशी आहेत का?  शेतकरी हिताय हा उद्देश सोडून आता अनेक बाजार समित्याही ‘व्यापारी हिताय’ काम करु लागल्याचे दिसत आहे़ बाजार समित्यांचे संचालक शेतकरी हिताचे कोणते मुद्दे पुढे रेटतात? नेते याबाबत का बोलत नाहीत? बाजार समिती नक्की कुणाची ? ही लेखमाला वाचा आजपासून.

शिवाजी पवार श्रीरामपूर : बाजार समितीच्या अधिनियमानुसार समितीच्या आवारात फक्त शेतमालाची विक्री होते. त्यात पॅकिंग मटेरिअलची किंमत धरली जात नाही. त्यामुळे फळे व भाजीपाला विकल्यानंतर क्रेट, कंटेनर व पोती शेतकºयांना परत करायला हवीत. मात्र, नगर जिल्ह्यातील बहुतेक    बाजार समित्यांमध्ये कांदा गोण्या शेतकºयांना कधीही परत केल्या जात नाहीत. किंवा त्यापोटीचे शुल्कही दिले जात नाही. याची थेट झळ   अनेक वर्षांपासून शेतकºयांना बसत आहे. 

शेतकºयांच्या पिकांना दर मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होतेच. मात्र, बाजार समित्यांमध्येही विविध कारणांखाली शेतकºयांची आर्थिक लूट सुरु आहे. कांदा विक्रीमध्ये शेतकरी गोणीत कांदा भरुन बाजार समितीत आणतात. कांदा गोणी शेतकरी विकत घेतात. 

बारदानाची गोण असेल तर एका गोणीसाठी त्यांना सुमारे ३५ ते ४० रुपये मोजावे लागतात. एका गोणीत साधारण ५० ते ५५ किलो कांदा बसतो. म्हणजे एक क्विंटल कांद्यासाठी ४० रुपयांची गोण घेतली तर शेतकºयांना आठ हजार रुपये खर्च होतो. काही बाजार समित्यांमध्ये प्लास्टिकची गोण चालते. ही गोण १० ते बारा रुपयांत पडते. मात्र, या गोणीत कांदा नेला की व्यापारी घट पकडतात. कारण या गोणीत कांदा खराब होतो, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांनी नेलेल्या गोणीतच व्यापारी कांदा पुढे पाठवितात. म्हणजे व्यापाºयाला कांदा गोणीसाठी खर्च येत नाही. मात्र, या गोणीचे पैसे व्यापारी शेतकºयाला परत करत नाहीत. विद्यापीठ व शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा लागवड व काढणी यापोटीचा उत्पादन खर्च हा क्विंटलमागे सुमारे ४००  रुपये आहे. त्यानंतर कांदा बाजार समितीत नेताना क्विंटलमागे एकरी १०० ते १२० रुपये खर्च येतो. म्हणजे प्रती क्विटंल शेतकºयाचा खर्च हा ५०० ते ५२० रुपये जातो. मात्र, श्रीरामपूर बाजार समितीत सोमवारी शेतकºयांना सरासरी ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. म्हणजे शेतकºयांना जवळपास मुद्दल किमतीत कांदा विकावा लागला. --कृषी उत्पन्न बाजार समिती नियम अधिनियम १९६३ नुसार समितीच्या आवारात शेतीमालाची ठरणारी किंमत ही केवळ मालाची असते. त्यात पॅकिंग मटेरियलचा खर्च धरला जात नाही. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांची विक्री केल्यानंतर क्रेट, कंटेनर किंवा पोती शेतकºयांना परत  केली जातात. मात्र कांद्याच्या बाबतीत असे घडत नाही.  --------------

पूर्वी राज्य सरकारने कांदा गोणीचे पैसे व्यापाºयांनी शेतकºयांना द्यावेत असा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारने पुन्हा त्यास स्थगिती दिली. व्यापाºयांचे म्हणणे असे आहे की आम्ही पुढे ज्या व्यापाºयांना माल पाठवितो तेही आम्हास पैसे देत नाही. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. - किशोर काळे,  सचिव बाजार समिती श्रीरामपूर