शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कांद्याची गोणी परत मिळेना व पैसेही नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:55 IST

शेतकºयांच्या कल्याणासाठी बाजार समित्या सुरु झाल्या़ मात्र, बाजार समित्या आज खरोखर शेतकºयांच्या पाठीशी आहेत का?  शेतकरी हिताय हा उद्देश सोडून आता अनेक बाजार समित्याही ‘व्यापारी हिताय’ काम करु लागल्याचे दिसत आहे़ बाजार समित्यांचे संचालक शेतकरी हिताचे कोणते मुद्दे पुढे रेटतात? नेते याबाबत का बोलत नाहीत? बाजार समिती नक्की कुणाची ? ही लेखमाला वाचा आजपासून.

शिवाजी पवार श्रीरामपूर : बाजार समितीच्या अधिनियमानुसार समितीच्या आवारात फक्त शेतमालाची विक्री होते. त्यात पॅकिंग मटेरिअलची किंमत धरली जात नाही. त्यामुळे फळे व भाजीपाला विकल्यानंतर क्रेट, कंटेनर व पोती शेतकºयांना परत करायला हवीत. मात्र, नगर जिल्ह्यातील बहुतेक    बाजार समित्यांमध्ये कांदा गोण्या शेतकºयांना कधीही परत केल्या जात नाहीत. किंवा त्यापोटीचे शुल्कही दिले जात नाही. याची थेट झळ   अनेक वर्षांपासून शेतकºयांना बसत आहे. 

शेतकºयांच्या पिकांना दर मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होतेच. मात्र, बाजार समित्यांमध्येही विविध कारणांखाली शेतकºयांची आर्थिक लूट सुरु आहे. कांदा विक्रीमध्ये शेतकरी गोणीत कांदा भरुन बाजार समितीत आणतात. कांदा गोणी शेतकरी विकत घेतात. 

बारदानाची गोण असेल तर एका गोणीसाठी त्यांना सुमारे ३५ ते ४० रुपये मोजावे लागतात. एका गोणीत साधारण ५० ते ५५ किलो कांदा बसतो. म्हणजे एक क्विंटल कांद्यासाठी ४० रुपयांची गोण घेतली तर शेतकºयांना आठ हजार रुपये खर्च होतो. काही बाजार समित्यांमध्ये प्लास्टिकची गोण चालते. ही गोण १० ते बारा रुपयांत पडते. मात्र, या गोणीत कांदा नेला की व्यापारी घट पकडतात. कारण या गोणीत कांदा खराब होतो, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांनी नेलेल्या गोणीतच व्यापारी कांदा पुढे पाठवितात. म्हणजे व्यापाºयाला कांदा गोणीसाठी खर्च येत नाही. मात्र, या गोणीचे पैसे व्यापारी शेतकºयाला परत करत नाहीत. विद्यापीठ व शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा लागवड व काढणी यापोटीचा उत्पादन खर्च हा क्विंटलमागे सुमारे ४००  रुपये आहे. त्यानंतर कांदा बाजार समितीत नेताना क्विंटलमागे एकरी १०० ते १२० रुपये खर्च येतो. म्हणजे प्रती क्विटंल शेतकºयाचा खर्च हा ५०० ते ५२० रुपये जातो. मात्र, श्रीरामपूर बाजार समितीत सोमवारी शेतकºयांना सरासरी ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. म्हणजे शेतकºयांना जवळपास मुद्दल किमतीत कांदा विकावा लागला. --कृषी उत्पन्न बाजार समिती नियम अधिनियम १९६३ नुसार समितीच्या आवारात शेतीमालाची ठरणारी किंमत ही केवळ मालाची असते. त्यात पॅकिंग मटेरियलचा खर्च धरला जात नाही. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांची विक्री केल्यानंतर क्रेट, कंटेनर किंवा पोती शेतकºयांना परत  केली जातात. मात्र कांद्याच्या बाबतीत असे घडत नाही.  --------------

पूर्वी राज्य सरकारने कांदा गोणीचे पैसे व्यापाºयांनी शेतकºयांना द्यावेत असा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारने पुन्हा त्यास स्थगिती दिली. व्यापाºयांचे म्हणणे असे आहे की आम्ही पुढे ज्या व्यापाºयांना माल पाठवितो तेही आम्हास पैसे देत नाही. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. - किशोर काळे,  सचिव बाजार समिती श्रीरामपूर