शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘उसाच्या आगारा’त कांद्याला पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:52 IST

उसाचे आगार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेत गेल्या चार वर्षांपासून कांद्याने (गावरान) घुसखोरी केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवाशातील शेतकरीही ‘रब्बी’त कांद्यालाच पसंती देऊ लागले आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : उसाचे आगार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेत गेल्या चार वर्षांपासून कांद्याने (गावरान) घुसखोरी केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवाशातील शेतकरीही ‘रब्बी’त कांद्यालाच पसंती देऊ लागले आहेत.गोदावरी, प्रवरा, मुळा नदीसह भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणाचे पाणी उपलब्ध असलेल्या उत्तरेतील शेतकऱ्यांचे ऊस हेच लाडके पीक राहिले आहे. प्रामुख्याने साखर कारखानदारीही याच भागात फुललेली दिसते. काही भागात फळबागाही आहेत. मात्र गत पाच वर्षांपासून वातावरणातील बदल, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता, ठराविक कालावधीनंतर मिळणारा भाव यामुळे या भागातील शेतकरी कांद्याकडे वळल्याचे दिसते. ‘समन्यायी’ पाणी वाटप कायद्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे ऊस जगविताना अडचणी येतात. त्याशिवाय तुलनेत कांदा साडेतीन चार महिन्यात निघणारे पीक आहे. त्यामुळे उसाबरोबरच शेतकरी कांद्यालाही पसंती देतात.विशेषत: कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूरला कांदा लागवड होते. संगमनेरच्या पठार भागात खरीप हंगामात लाल (नाशिक) कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्या कांद्याचे गणित पावसावर असते. इतर भागात मात्र रब्बी हंगामात कांदा (गावरान) लागवड होते. खरिपात कांदा लागवडीचे प्रमाण तसे नगण्य आहे. भाव नसल्यास कांदा चाळींमध्ये साठवणूकही केली जाते. भावातील चढउतारानुसार कांदा किती दिवस ठेवायचा हे शेतकरी ठरवितात.संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, वांबोरी, घोडेगाव (ता. नेवासा)आदी बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा विक्रीस आणतात. कोपरगाव, संगमनेरचे शेतकरी येवला, लासलगावलाही कांदा विक्रीसाठी पाठवितात. गेल्या काही वर्षांपासून पूर्वेकडील पश्चिम बंगाल, ओरिसामध्येही कांदा पाठविला जात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर