शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

एकच प्रश्ऩ़ आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:38 IST

अरुण वाघमोडे अहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच ...

ठळक मुद्दे उपोषणकर्त्या शुभांगीने मांडली शेतक-याची व्यथा

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच बापाची नव्हे तर सा-या शेतक-यांचीच ही व्यथा़ शाळेच्या ‘फी’साठी बापाकडे पैसे मागताना जीव कासावीस होतो़ या व्यवस्थेत आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं अन् कुटुंबाचं पालन करायचं कसं? या एकाच प्रश्नाचा सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही तिघी मैत्रिणींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ आमच्या आंदोलनाचा शेवट काय होईल हे माहित नाही़़़पण शेतकºयाची कन्या आता जागृत होऊन सरकारला जाब विचारत आहे हे तरी सर्वांना समजेल’ अशी वेदना पुणतांबा येथे शेतकºयांच्या प्रश्नासाठी उपोषण करत असलेल्या शुभांगी संजय जाधव या शेतकरी कन्येने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़पुणतांबा (ता़ राहाता) येथे गेल्या पाच दिवसांपासून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी शुभांगीसह निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव या शेतकºयांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ शुभांगी हिची प्रकृती खालावल्याने तिला गुरूवारी रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ शुभांगीने मात्र रूग्णालयातही उपोषण सुरूच ठेवले आहे़ सरकार जोपर्यंत सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही असा निश्चय शुभांगी हिने केला आहे़शुभांगी हिने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी येतात आणि उपोषण मागे घ्या़़ अशी विनंती करतात़ मात्र ‘सर्व मागण्या मान्य केल्या आहेत’ असे लेखी आश्वासन कुणीच देत नाहीत़ आम्ही तिघी मैत्रिणींचे आई-वडील शेती करतात़ शेतकºयांची व्यथा आणि वेदना आम्ही बालपणापासून पाहत आहोत. उपोषणाचा निर्णयही आमचा तिघींचाच होता़ शेतकºयांसाठी उपोषण करा असे आम्हाला कुणीही सुचविले नव्हते़ आम्हाला उपोषण करताना पाहून आमच्याच नव्हे तर सर्वच शेतकरी माता-पित्यांचा जीव तीळ-तीळ तुटत आहे. उपोषण मागे घ्या अशी विनवणी प्रत्येक जण करत आहे़ पण शेतकरी बापासाठी अन्नत्याग करण्याचा निश्चय केला आहे़ यापासून आम्हाला आता कुणी रोखू शकत नाही़. सरकारला खरंच शेतक-यांची काळजी असेल तर मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करावी़ तेव्हा उपोषण मागे घेऊ़कोण आहेत या कृषिकन्याशुभांगी ही कोपरगाव येथील एस़एस़जी.एम महाविद्यालयात एस.वाय.बी.एस्सीचे शिक्षण घेत आहे़ पूनम शुभांगीच्याच वर्गात आहे तर निकिता ही पुणे येथे ‘लॉ’चे शिक्षण घेत आहे़ या तीनही मुली १९ ते २० या वयोगटातील असून, त्यांचे आई-वडील पुणतांबा येथे शेती करतात़शेतक-यांचे दु:ख समजण्याइतपत आम्ही मोठ्या आहोतआमच्या मायेपोटी बहुतांश जण सांगतात की, तुम्ही अजून लहान आहात़ आधी शिक्षण करून घ्या मग आंदोलन करा, पण शेतकºयांचं दु:ख समजण्याइतपत आम्ही नक्कीच मोठ्या आहोत़ शेतकºयांच्या प्रश्नांसाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व कृषिकन्या बाहेर पडल्या तर आमच्या आंदोलनाचे हे मोठे फलित असेल असे शुभांगी हिने सांगितले़जगणं सुकर व्हावं याच मागण्याशेतकरी या सरकारकडे फुकट काहिच मागत नाही़ शेती करून किमान स्वाभिमानाने जगता यावे याच आमच्या मागण्या आहेत़ शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, कृषीसंलग्न वस्तूंवरील जीएसटीतून माफी, सिंचन, शेती अवजारांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाला योग्य दर अशा आमच्या मागण्या असल्याचे शुभांगी हिने सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर