शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यात दीड हजार लोकांमागे अवघा एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:42 IST

क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात सध्या ३ हजार २७७ पोलीस कर्मचारी आहेत.

अरूण वाघमोडेअहमदनगर : क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात सध्या ३ हजार २७७ पोलीस कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत १५२५ लोकांमागे अवघा एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे.जागतिक स्तरावर साधारणत: २०० लोकांमागे एक पोलीस असावा असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात ३०० ते ३५० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असणे असे प्रमाण आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्याच्या तुलनेत नगरमध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. नगरच्या तुलनेत नाशिक ग्रामीण आणि जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाणही कमी आहे. या दोन जिल्ह्यात मात्र नगरच्या तुलनेत पोलीस कर्मचारी आणि पोलीस ठाण्यांची संख्याही अधिक आहे.अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने हे सर्व सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची ४५ लाख ४३ हजार १५९ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत साडेचार ते पाच लाखांनी ही लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या मात्र वाढविण्यात आलेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि गुन्ह्याचे प्रमाण याचा तुलनात्मक अभ्यास करून शासनाला अहवाल पाठविलेला आहे. नगरचे पोलीस बळ वाढविण्याची मानसिकता मात्र शासनाची दिसत नाही. सध्या मोहरम आणि गणेशोत्सवमुळे जिल्ह्याबाहेरून पोलिसांची मागणी केली आहे.नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. नाशिक परीक्षेत्रातील जिल्ह्यांच्या तुलनेत नगरमध्ये गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. या संदर्भात गृह विभागाला तुलनात्मक माहिती देण्यात आलेली आहे. येणा-या काळात नगरमध्ये पोलिसांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या आहे त्या पोलीस बळात नियोजन करून कायदा आणि सुव्यवस्था राखली जात आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणा-या प्रत्येकाची फिर्याद दाखल करून घेतली जाते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.जिल्ह्यात पोलिसबळ कमी असल्याने गणेशोत्सव आणि मोहरमच्या बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातून १००० पोलिसांची मागणी करण्यात आलेली आहे.

सहा ठाण्यांची मंजुरी प्रलंबितजिल्हा पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे केडगाव, सावेडी (नगर), बोधेगाव (शेवगाव), देवळालीप्रवरा (राहुरी), मिरजगाव (कर्जत) तिसगाव (पाथर्डी) या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविलेला आहे. शासनाकडून मात्र या ठाण्यांना अद्यापपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस