शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाशिवाय उभे राहायला शिकले पाहिजे; हे वाचनातूनच घडत -रामदास फुटाणे

By सचिन धर्मापुरीकर | Updated: September 27, 2023 17:00 IST

नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे, असे मत प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : “आपण आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकले पाहिजे. हे वाचनातूनच घडते. कारण वाचनामुळे दोन कानांमधील प्रदेश सुपीक होतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. संस्कृती घडते व संवाद वाढतो. स्व-जाणीव जागृत होते. निर्णय घेण्याची क्षमता तयार होते. म्हणूनच आपल्या मातृभाषेतील अनेक पुस्तके आणि कर्मवीर अण्णांचे जीवन चरित्र वाचले पाहिजेत. यासाठी नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे, असे मत प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय या शाखांच्या वतीने कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामदास फुटाणे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे हे होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बिपिन कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य चैताली काळे व विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन, मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम, ॲड. संदीप वर्पे, अरुणचंद्रे, सुनील गंगुले, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. रमेश सानप, मन्सुरी सिराज शेखलाल, प्रमोदिनी शेलार, . सुभाष दरेकर, नंदकुमार खाडे महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, प्रा. अरुण देशमुख, डॉ. अर्जुन भागवत तसेच प्रा. संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

पुढे बोलताना फुटाणे म्हणाले, झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे. कदाचित पुढील काळात मानवाच्या स्री व पुरुष या दोनच जाती असतील. त्यामुळे जातीपातीत अडकू नये. शाळेच्या दाखल्यावरून जोपर्यंत जात हा शब्द जात नाही, तोपर्यंत एकात्म व एकसंध भारताचे सुंदर दर्शन घडणार नाही. राजकारणी स्वार्थासाठी जातीचा उपयोग करून घेत आहेत. आपण मात्र या जातीभेदाच्या खडकावर एकात्मतेचे वृक्षारोपण करायला हवे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सीमा चव्हाण, डॉ. वैशाली सुपेकर, प्रा,डॉ.सुनिता अत्रे व प्रा. रवींद्र हिंगे यांनी केले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर