शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविणार -नरेंद्र पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:54 IST

राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सोबत घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असून, राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.पुणे महामार्गावरील मंगल कार्यालयात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हा, या कार्यक्रमात पाटील बोलत होते. आमदार संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, उद्योजक चंद्रकांत गाडे, नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाअुलबुधे, माजी नगरसेवक  बाळासाहेब पवार, निखील वारे, माजी सभापती सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, राजकीय जोडे बाजूला ठेवून अण्णासाहेब विकास महामंडळाची वाटचाल सुरू आहे. योजनेसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांची शिफारस लागत नाही. कर्जाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन आहे. महामंडळाच्या योजनांची माहिती आणि येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय दौरे सुरू करण्यात आले आहे. दौºयांची सुरुवात जालना जिल्ह्यातून करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी अनेकांनी समन्वयक म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पडली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची जिल्हानिहाय बैठका घेण्यात येतील. या बैठकांमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरी भागात योजनांचा लाभ मिळेलच. परंतु, ग्रामीण भागातील युवकांना दिशा मिळत नाही. त्यांना दिशा देण्याचे काम महामंडळांच्या माध्यमातून केले जाणार असून, ही योजना शेतकºयांच्या बांधावर पोहोचविण्याचा मानस आहे, असे पाटील म्हणाले.सरकार घरी आणून रोजगार देणार नाही. उद्योजक बनण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावे लागतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.राज्यातील १० हजार समाज बांधव महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. आणखी ९० हजार उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम केलेल्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbusinessव्यवसाय