शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे इंधनाची दरवाढ; दुसरीकडे वाढले खाद्यतेलाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

संगमनेर : सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एकीकडे इंधनाची दरवाढ तर दुसरीकडे वाढलेले खाद्यतेलाचे भाव यामुळे सर्वसामान्य ...

संगमनेर : सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एकीकडे इंधनाची दरवाढ तर दुसरीकडे वाढलेले खाद्यतेलाचे भाव यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याचे नियोजन करत असताना सर्वसामान्यांना आता महागाईचा फटका बसतो आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पहिल्या लाटेत केलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले कडक निर्बंध यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार, कामगार, शेतकरी अशा सर्वांचीच धडपड सुरू असताना पेट्रोल, डिझेलची झालेली दरवाढ आणि खाद्यतेलाचे वाढलेले भाव याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना बसते आहे. पेट्रोल १०८ रुपये प्रति लीटर झाले आहे. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही. शंभर रुपयात एक लीटर पेट्रोल तसेच एक लीटर तेलही आता येत नाही. खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागतो आहे.

----------------

तेलाचे प्रकार ऑगस्ट (२०२१) नोव्हेंबर (२०२०)

सोयाबीन तेल १५० १०५

पामतेल १४० ९०

सूर्यफूल तेल १७० १३०

शेंगदाणा तेल १८० १५०

(भाव रुपये प्रतिलीटरमध्ये)

--------------

दिवाळीच्या आधीपासून खाद्यतेलाचे वाढलेले भाव मध्यंतरी काही दिवस कमी झाले होते. आता पुन्हा भाव वाढले आहेत. परदेशातून फार मोठ्या प्रमाणात भारतात खाद्य तेलाची आवक होते. या वर्षी अमेरिका, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. मलेशिया, इंडोनेशिया या पामतेल उत्पादक देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने त्याचाही परिणाम जाणवत असून खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत.

विशाल कर्पे, किराणा व्यावसायिक, संगमनेर

---------------------

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात आमचा केटरिंग व्यवसाय आहे. कोरोना संसर्गामुळे विवाह सोहळे सध्या मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होतात. त्यामुळे केटरिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचे काम कमी झाले आहे. आम्हीदेखील मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतो आहे. त्यात खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती आणि इंधनाची दरवाढ यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

स्वाती नवनीत जोशी, केटरिंग व्यवसाय, गृहिणी, सोलापूर

------------------

खाद्यतेलाचे भाव खूपच वाढल्याने महिन्याचा किराणा आणताना चारशे ते पाचशे रुपये अधिक लागतात. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. त्यामुळे कुठलाच पर्याय नसतो. काही महिन्यांपूर्वी १३० रुपये लीटर असलेले सूर्यफूल तेल आता १७० ते १७५ रुपये लीटर झाले आहे.

- क्रांती कुलदीपसिंग ठाकूर, गृहिणी, संगमनेर

----------------