शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

एक कोटी धनगर आरक्षणापासून वंचित

By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST

अहमदनगर : धनगर समाजाला केंद्र सरकारने १९५६ मध्ये आरक्षण लागू केले़ मात्र, राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे गेल्या ५८ वर्षांपासून १ कोटीहून अधिक धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे़

अहमदनगर : धनगर समाजाला केंद्र सरकारने १९५६ मध्ये आरक्षण लागू केले़ मात्र, राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे गेल्या ५८ वर्षांपासून १ कोटीहून अधिक धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे़ आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ९ जुलै रोजी नगरमध्ये प्रथमच राज्यस्तरीय आरक्षण हक्क परिषद होत आहे़केंद्र सरकारने १९५६ व ७६ साली महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगरऐवजी धनगड असे नमूद करुन आरक्षण दिले आहे़ भाषिक अनुवादातून झालेल्या चुकीमुळे हा समाज गेल्या ५८ वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे़ राज्यात धनगड नव्हे तर धनगर समाज असल्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी व समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे़ त्यासाठी आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे धनगर समाज पाठपुरावा करीत आहे़ मात्र, राज्य सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत येथील कोहिनूर मंगल कार्यालयात बुधवारी (दि़९) राज्यस्तरीय धनगर समाज आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे़ आरक्षण हक्क परिषदेचे नुकतेच आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना निमंत्रण देण्यात आले़ यावेळी आरक्षण कृती समितीचे विजय तमनर, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर तमनर, शिवसेना उपशहरप्रमुख दिगंबर ढवण, वावरथ जांभळीचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, निशांत दातीर, बापूसाहेब बाचकर, सोमनाथ बाचकर, चंद्रकांत तागड, बाळासाहेब मतकर, राजेंद्र तागड, सुरेश तमनर, ज्ञानेश्वर बरे, गणेश तागड, सचिन गावडे, बाबासाहेब तागड, राजेंद्र नजन, गोविंद तमनर आदी उपस्थित होते़ धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन पिचड यांनी कृती समितीला दिल्याचे समितीचे सदस्य दातीर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)