शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

दीड वर्षात जिल्ह्यात ४८२ विवाहितांचा छळ

By admin | Updated: July 10, 2014 00:32 IST

अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते.

अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते. कौटुंबिक कलहाच्या या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले जाते, मात्र खटले प्रलंबित राहिल्याने छळाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या आरोपींचे प्रमाणही नगण्य असल्याचे वास्तव समोर आले आहे.हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. हुंडाबळीच्या अनेक प्रकरणांमध्ये ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसते. पती व सासरच्या मंडळीकडून छळ या कारणावरून महिला थेट पोलीस ठाणे गाठतात. याबाबत नगर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०१३ या वर्षामध्ये जिल्ह्यात ३४३ हुंडाबळीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर जानेवारी ते जून २०१४ या काळात १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे दीड वर्षामध्ये तब्बल ४८२ महिलांचा छळ केल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)महिला सहायता कक्षपोलीस मुख्यालयात विवाहितांच्या छळाच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्ष कार्यरत आहे. या कक्षात तीन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एक सहायक आहे. दिवसभर महिला, त्यांचे कुटुंबीय आणि तक्रार घेऊन येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. तडजोड करण्याचा प्रयत्न या केंद्रात केला जातो.कोणतीही महिला कौटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला आधी महिला सहायिका कक्षात पाठविले जाते. तेथे दोन्हीकडील संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांचा संसार तुटणार नाही, यादृष्टीने समुपदेशन केले जाते.त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर त्यांच्यात तडजोड झाली नाही तर अखेर नाईलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित प्रकरण पोलीस ठाण्यात पाठविले जाते.-अशोक ढेकणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखाहुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण कमी आहे. खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. साक्षीदार, पुरावे मिळत नसल्याने हुंडाबळीची प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. लगतच्या लोकांची साक्ष, छळ झाल्याबाबत विवाहितेने वडिलांना पाठविलेले पत्र किंवा अन्य पुरावा, महिलांना त्रास झाल्याबाबत साक्ष नसणे या कारणांमुळे असे खटले कमकुवत होतात. गुन्हे दाखल करताना पोलीस आणि सरकारी वकील यांचा समन्वय होणेही गरजेचे आहे.-अ‍ॅड. सुरेश लगड, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकीलका होतात गुन्हे दाखल...क्षुल्लक कारणावरून भांडणेपतीला रोजगार नसणेमाहेराहून पैशासाठी तगादाव्यसनाधीन पतीनशेत होणारी मारहाण