शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात जिल्ह्यात ४८२ विवाहितांचा छळ

By admin | Updated: July 10, 2014 00:32 IST

अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते.

अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते. कौटुंबिक कलहाच्या या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले जाते, मात्र खटले प्रलंबित राहिल्याने छळाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या आरोपींचे प्रमाणही नगण्य असल्याचे वास्तव समोर आले आहे.हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. हुंडाबळीच्या अनेक प्रकरणांमध्ये ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसते. पती व सासरच्या मंडळीकडून छळ या कारणावरून महिला थेट पोलीस ठाणे गाठतात. याबाबत नगर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०१३ या वर्षामध्ये जिल्ह्यात ३४३ हुंडाबळीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर जानेवारी ते जून २०१४ या काळात १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे दीड वर्षामध्ये तब्बल ४८२ महिलांचा छळ केल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)महिला सहायता कक्षपोलीस मुख्यालयात विवाहितांच्या छळाच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्ष कार्यरत आहे. या कक्षात तीन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एक सहायक आहे. दिवसभर महिला, त्यांचे कुटुंबीय आणि तक्रार घेऊन येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. तडजोड करण्याचा प्रयत्न या केंद्रात केला जातो.कोणतीही महिला कौटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला आधी महिला सहायिका कक्षात पाठविले जाते. तेथे दोन्हीकडील संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांचा संसार तुटणार नाही, यादृष्टीने समुपदेशन केले जाते.त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर त्यांच्यात तडजोड झाली नाही तर अखेर नाईलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित प्रकरण पोलीस ठाण्यात पाठविले जाते.-अशोक ढेकणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखाहुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण कमी आहे. खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. साक्षीदार, पुरावे मिळत नसल्याने हुंडाबळीची प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. लगतच्या लोकांची साक्ष, छळ झाल्याबाबत विवाहितेने वडिलांना पाठविलेले पत्र किंवा अन्य पुरावा, महिलांना त्रास झाल्याबाबत साक्ष नसणे या कारणांमुळे असे खटले कमकुवत होतात. गुन्हे दाखल करताना पोलीस आणि सरकारी वकील यांचा समन्वय होणेही गरजेचे आहे.-अ‍ॅड. सुरेश लगड, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकीलका होतात गुन्हे दाखल...क्षुल्लक कारणावरून भांडणेपतीला रोजगार नसणेमाहेराहून पैशासाठी तगादाव्यसनाधीन पतीनशेत होणारी मारहाण