शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

‘मुळा’त अवघा दीड टीएमसी जीवंत साठा

By admin | Updated: June 3, 2014 00:27 IST

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या १३२५ क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ सध्या धरणात ६ हजार १८१ दलघफू पाणीसाठा असून, त्यातील ४५०० दलघफू मृतसाठा आहे. उजवा कालवा सुरू असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. उजव्या कालव्याखालील पाण्याची मागणी सुरूच आहे़त्यामुळे आणखी किती पाणी लागेल व कालवा किती दिवस चालेल याबाबत पाठबंधारे खातेही रामभरोस आहे़ कालवा बंद होण्याच्या अगोदर तीन तास पाटबंधारे खात्याला शेतीचे भरणे पूर्ण झाल्याचे कळणार आहे़ टेल भागात अजूनही पाण्याची मागणी कायम आहे़ पावसाळा लांबल्याने शेतकर्‍यांपुढे पेरणी करण्याचे आव्हान आहे़ मुळा धरणाचा डावा कालवा दहा दिवसांपूर्वीच बंद झाला आहे़ डाव्या कालव्यातून ७०० दलघफू पाण्याचा वापर झाला आहे़ पावसाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने श्ोतकरी दुहेरी पध्दतीने पिकाचे भरणे करीत आहेत़ उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने पाण्याची असलेली जमिनीची भूक वाढत आहे़ मुळा धरणात पिण्यासाठी व उद्योगासाठी जुलैअखेर पुरेल इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे़ शिवाय राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाटेल तेवढे पाणी धरणातून संशोधनासाठी मिळणार आहे़ मुळा डावा कालव्याखाली असलेल्या मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यास पाटबंधारे खात्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही़ (तालुका प्रतिनिधी)