शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोरोना नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना नियंत्रणाची जबाबदारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना नियंत्रणाची जबाबदारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक आराखडा तयार केला आहे. कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणे, कोविड केअर सेंटर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणणे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत मार्गदर्शक सूचनांनी अंमलबजावणी करण्याचे आदेशात म्हटले आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करणे, चाचण्यांची संख्या वाढविणे, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती व बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत आढावा घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे, गर्दीची ठिकाणे, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, बस, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, उद्याने, मॉल्स, हॉटेल, रेस्टाॅरंट, कोचिंग क्लासेस आदी ठिकाणी उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. कोविड सेंटर सुसज्ज ठेवणे, रुग्ण वाढणाऱ्या भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणे, होम क्वारंटाइन करणे, जागृती करणे, सुपर स्प्रेडर्सकडून नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे, कोरोनाच्या संसर्गाबाबत २४ तास रुग्णालय कार्यरत ठेवणे, औषधसाठा, मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, कोविड सेंटरमध्ये वेळोवेळी भेटी देणे, डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली आहे. कोरोनावरील लस वाटपाचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी करणार आहेत. महापालिका क्षेत्रात उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय शहरातील लसीकरणाचाही आढावा ते घेणार आहेत. कोरोनाबाबत झालेल्या खर्चाबाबत जिल्हा नियोजन अधिकारी खातरजमा करणार आहेत. याशिवाय अन्न व औषध प्रशासनातील सहायक आयुक्त (औषध विक्री व ऑक्सिजनची व्यवस्था), आरटीओ (वाहनांच्या तपासण्या), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचा उपाययोजना राबविण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे), प्रांताधिकारी (सर्व तहसील यंत्रणेकडून अंमलबजावणी करून घेणे) आदी अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या दिल्या आहेत.