शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:16 IST

श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मेनरोड वरील जुन्या प्राथमिक शाळेजवळ रविवारी सकाळी सहा वाजता पाईपलाईनचा जोड निघाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.सामाजिक कार्यकर्ते दत्ता जगताप यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे व नगरसेवक अशोक खेंडके यांना दिली. अशोक खेंडके तात्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर तब्बल एक तासाने पाणी बंद झाले.पालिकेने जुने पाईपलाईनचे कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली. दुस-या दिवशी नवीन नळाला पाणी येईल म्हणून पहाटेपासून नागरिक वाट पहात बसले. पण नवीन पाईपलाईन शेवटी बंद करण्याची गरज असते. मात्र पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी-कर्मचारी विसरून गेले. त्यामुळे सोडलेले पाणी नळाला न येता वाहून गेले.या प्रकारासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रार करुन संबधीत अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याकरिता ग्राहक पंचायतीकडे दाद मागणार असल्याचे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ता जगताप यांनी सांगितले.चौकशी करणारसध्या पाईपलाईनचे काम चालू आहे. नवीन पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. पाईपलाईनचा जॉईन्ट निघाल्याने पाणी वाया गेले. याची चौकशी करुन ठेकेदाराला नोटीस देणार आहे. - शुभांगी पोटे, नगराध्यक्षा

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा