शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:16 IST

श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मेनरोड वरील जुन्या प्राथमिक शाळेजवळ रविवारी सकाळी सहा वाजता पाईपलाईनचा जोड निघाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.सामाजिक कार्यकर्ते दत्ता जगताप यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे व नगरसेवक अशोक खेंडके यांना दिली. अशोक खेंडके तात्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर तब्बल एक तासाने पाणी बंद झाले.पालिकेने जुने पाईपलाईनचे कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली. दुस-या दिवशी नवीन नळाला पाणी येईल म्हणून पहाटेपासून नागरिक वाट पहात बसले. पण नवीन पाईपलाईन शेवटी बंद करण्याची गरज असते. मात्र पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी-कर्मचारी विसरून गेले. त्यामुळे सोडलेले पाणी नळाला न येता वाहून गेले.या प्रकारासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रार करुन संबधीत अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याकरिता ग्राहक पंचायतीकडे दाद मागणार असल्याचे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ता जगताप यांनी सांगितले.चौकशी करणारसध्या पाईपलाईनचे काम चालू आहे. नवीन पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. पाईपलाईनचा जॉईन्ट निघाल्याने पाणी वाया गेले. याची चौकशी करुन ठेकेदाराला नोटीस देणार आहे. - शुभांगी पोटे, नगराध्यक्षा

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा