शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

अवास्तव अंदाजपत्रकावर सदस्यांचा आक्षेप

By admin | Updated: October 23, 2024 13:32 IST

अहमदनगर: अंदाजपत्रकातील अवास्तव तरतुदी प्रशासनाच्या चांगल्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत़ संकलित करातून प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न कमी आहे,

अहमदनगर: अंदाजपत्रकातील अवास्तव तरतुदी प्रशासनाच्या चांगल्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत़ संकलित करातून प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न कमी आहे, परंतु अंदाजपत्रकात हा आकडा फुगविला कसा, महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याचे खरे मूळ यातच आहे, असे सांगून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़ दरम्यान सभा तहकूब करून बुधवारी पुन्हा अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचे यावेळी ठरले़ सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीच्या सुरू झालेल्या सभेत २०१४-१५ अंदाजपत्रकावर चर्चेला सुरुवात झाली़ पहिल्याच दिवशी सदस्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले़ अंदाजपत्रक वास्तव नाही, अशी टीका सदस्यांनी केली़ सभेच्या सुरुवातीला लेखा परीक्षणाच्या अहवालाची मागणी करत सदस्यांनी गोंधळ घातला़ त्यासाठी सभा काही वेळासाठी तहकूब करण्यात आली़ अर्ध्या तासानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली़ सुरुवातीला आरोग्य विभागाचा दरवाढीचा प्रस्ताव सदस्यांनी फेटाळला़ ही वाढ कायदेशीर नसल्याचे कारण सदस्यांनी दिले़ महापौर दुर्धर आजार अर्थसहाय्य निधीचा ठराव कोणी केला, त्याचे निकष काय आहेत, असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित केला़ आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही मदत देणे योग्य नाही, त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्तीकडून निधी मदतीचे आवाहन करून त्यातून ही मदत करावी, अशा सूचना लेखा परीक्षकांनी दिल्या असल्याबाबत लेखा व वित्त अधिकारी प्रदीप शेलार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़ यावर चर्चा होऊन ही सेवा बंद न करता त्यात सुधारणा करण्याचे ठरले़ प्रशासनाने संकलित करातून ३५ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले़ याविषयी दीप चव्हाण म्हणाले, मागील वर्षी संकलित करातून किती उत्पन्न मिळाले़ त्यावर प्रशासनाने १२ कोटी ३६ लाखांची वसूल झाली आहे, असे उत्तर वसुली विभागाने दिले़ जर १२ कोटीच वसूल होतात तर तर यावेळी ३५ कोटी होईल, हे गृहीत धरणे योग्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ वसुलीत मोठी तफावत असूनही अंदाजपत्रकात वसुलीचा आकडा फुगविण्यात आला़ काय आहे वादग्रस्त तरतूद महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत संकलित कर आहे़संकलित करातून मिळणार्‍या उत्पन्नावर महापालिकेचा डोलारा उभा असतो़ मागील वर्षी संकलित करातून ३५ कोटीपैकी १२ कोटी ३६ लाखांची वसुली झाली़ कराची १०० टक्के वसुली होत नाही,हे माहित असूनही प्रशासनाने पुढील अर्थिक वर्षात १०० टक्के वसूल होऊन महापालिकेला त्यातून ३५ कोटींचे उत्पन्न मिळेल,असा अंदाज अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे़ विकासावर परिणाम अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे उत्पन्न मिळेल,असे गृहीत धरून पुढील वर्षांत खर्च केला जातो़ मात्र उत्पन्न येत नाही़ त्यामुळे ठेकेदारांची देयके रखडतात़विकास कामे होत नाहीत़परिणामी नियोजन कोलमडते़ परवाना नसला तरी पाच हजार उत्पन्न श्वानांच्या परवान्यातून पाच हजाराचे उत्पन्न अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे़ या उत्पन्नावर आक्षेप घेत सदस्यांनी किती परवाने दिले, याची माहिती मागविली असता असा कोणताही परवाना दिला जात नाही, एवढेच नाही तर परवाना देण्याची सुविधाच नसल्याचे उघड झाले़ यामुळे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला.