शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत ...

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत महिनाभरापासून हाच आकडा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढला किंवा कमी झाला असे नाही तर रुग्णांची संख्या स्थिर आहे. एखाद्या दिवशी बाधितांची संख्या कमी किंवा जास्त झाली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही सरासरी पाच हजार एवढीच आहे.

राज्यात पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अहमदनगरसह पुणे, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ७०० ते ८०० एवढी सरासरी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यात रुग्णसंख्या स्थिरच आहे. संपर्क, संसर्ग, गर्दीचे कार्यक्रम होत असल्याने आणि नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सोमवारी जिल्ह्यात ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ८८७ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता पाच हजार ४३६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटिजन चाचणीत २३१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरच्या पुढे आढळून आली.

--------------

सक्रिय रुग्णांमध्ये अहमदनगर चौथे

पुणे- १३,५०३

ठाणे- ७२८३

सातारा- ५५१५

अहमदनगर- ५१६८

सोलापूर- ४२२४

सांगली- ४७१२

-------------

संगमनेरमध्ये आधीपासूनच रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे. पारनेर तालुक्यात दोन-तीन महिन्यांपासून शंभरपुढे रुग्णसंख्या आहे. एखाद्या ठिकाणी आधीपासूनच रुग्णसंख्या जास्त असेल तर तिथे बाधित होण्याचे प्रमाण तेवढेच राहते. चाचण्यांपैकी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्के आहे. हे प्रमाण गत दोन महिन्यांपासून स्थिर आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत, असे म्हणता येत नाही.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ३,१०,६६८

उपचार सुरू असलेले रुग्ण : ५४३६

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६५२९

एकूण रुग्णसंख्या : ३,२२,६३३

----------

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. लसीचा प्रभाव हा लाइफटाइम राहील, असे मुळीच नाही. ते एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले तरी नागरिकांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र नागरिक मास्क घालण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झाल्यास नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. जमधडे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही डोस घेतले असले तरी नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी सांगितले.