शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत ...

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत महिनाभरापासून हाच आकडा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढला किंवा कमी झाला असे नाही तर रुग्णांची संख्या स्थिर आहे. एखाद्या दिवशी बाधितांची संख्या कमी किंवा जास्त झाली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही सरासरी पाच हजार एवढीच आहे.

राज्यात पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अहमदनगरसह पुणे, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ७०० ते ८०० एवढी सरासरी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यात रुग्णसंख्या स्थिरच आहे. संपर्क, संसर्ग, गर्दीचे कार्यक्रम होत असल्याने आणि नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सोमवारी जिल्ह्यात ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ८८७ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता पाच हजार ४३६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटिजन चाचणीत २३१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरच्या पुढे आढळून आली.

--------------

सक्रिय रुग्णांमध्ये अहमदनगर चौथे

पुणे- १३,५०३

ठाणे- ७२८३

सातारा- ५५१५

अहमदनगर- ५१६८

सोलापूर- ४२२४

सांगली- ४७१२

-------------

संगमनेरमध्ये आधीपासूनच रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे. पारनेर तालुक्यात दोन-तीन महिन्यांपासून शंभरपुढे रुग्णसंख्या आहे. एखाद्या ठिकाणी आधीपासूनच रुग्णसंख्या जास्त असेल तर तिथे बाधित होण्याचे प्रमाण तेवढेच राहते. चाचण्यांपैकी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्के आहे. हे प्रमाण गत दोन महिन्यांपासून स्थिर आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत, असे म्हणता येत नाही.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ३,१०,६६८

उपचार सुरू असलेले रुग्ण : ५४३६

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६५२९

एकूण रुग्णसंख्या : ३,२२,६३३

----------

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. लसीचा प्रभाव हा लाइफटाइम राहील, असे मुळीच नाही. ते एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले तरी नागरिकांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र नागरिक मास्क घालण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झाल्यास नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. जमधडे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही डोस घेतले असले तरी नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी सांगितले.