शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आता पर्याय नाही...असे म्हणत शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा ...

अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातून गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या चव्हाण यांनी शेतात साचलेल्या पाण्याशेजारी बसून हा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला आहे. शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर दहा गुंठे शेती आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जेव्हा-जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा चारीतून गळती होऊन चव्हाण यांच्या शेतात तळे साचते. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होते, तसेच पुढील पीकही घेता येत नाही. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे चव्हाण यांचे गाऱ्हाणे आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाला जबाबदार धरले आहे. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे माझ्या शेतात पाणी साचते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडे तक्रारी केल्या मात्र काहीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं चव्हाण यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, सदर शेतकऱ्याच्या व्हिडिओबाबत आमच्यापर्यंत काहीच माहिती आली नसल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी सांगितले आहे.

--------------------------

धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र, काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप काहीच दखल घेतलेली नाही.

- बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव, ता. कोपरगाव

फोटो १२ बापू चव्हाण