शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता पर्याय नाही...असे म्हणत शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा ...

अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातून गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या चव्हाण यांनी शेतात साचलेल्या पाण्याशेजारी बसून हा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला आहे. शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर दहा गुंठे शेती आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जेव्हा-जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा चारीतून गळती होऊन चव्हाण यांच्या शेतात तळे साचते. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होते, तसेच पुढील पीकही घेता येत नाही. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे चव्हाण यांचे गाऱ्हाणे आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाला जबाबदार धरले आहे. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे माझ्या शेतात पाणी साचते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडे तक्रारी केल्या मात्र काहीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं चव्हाण यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, सदर शेतकऱ्याच्या व्हिडिओबाबत आमच्यापर्यंत काहीच माहिती आली नसल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी सांगितले आहे.

--------------------------

धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र, काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप काहीच दखल घेतलेली नाही.

- बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव, ता. कोपरगाव

फोटो १२ बापू चव्हाण