शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:26 IST

लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) शासनाने सुरू केली. या योजनेतून मागेल त्याला किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. रोहयोतून घरकुले, शौचालये, विहीर खोदाई, गोठे बांधणी या वैयक्तिक लाभाच्या कामांसह सामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्य तळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, काँक्रिट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाक घर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला, रस्ते आदी कामे जॉबकार्ड असलेल्या कामगारांमार्फत केली जातात. 

सध्या रोहयोची सुमारे १० हजार मजुरांकरवी १४०० कामे जिल्ह्यात सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच यंत्रणा ठप्प असल्याने रोजगार हमीवरील कामेही थांबली होती. मागील वर्षी (२०१९) उन्हाळ्याच्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत जिल्ह्यात रोहयोवर १ लाख ६ हजार मजूर होते. परंतुु यंदा लॉकडाऊनमुळे ही संख्या कमालीची घटली. एप्रिल, मे व जून (१५ जूनपर्यंत) २०२० या अडीच महिन्यात केवळ ३५ हजार मजूर कामावर होते. 

लॉकडाऊनचा हा फटका सर्वांनाच बसला. अनेकांचे हक्काचे रोजगार हिरावले गेले. त्यातही दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे शासनाने दिव्यांगांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी त्यांना रोहयोवर कामे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

शासनाच्या दिव्यांग आयुक्तालयाकडून ८ मे २०२० रोजी याबाबतचे परिपत्रक विभागीय आयुक्त व तेथून प्रत्येक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार अपंगांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहे.

जिल्ह्यात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी मजुरांची उपस्थिती काहीशी कमी झाली होती. परंतु हळूहळू आता ती वाढत आहे. या वर्षीपासून अपंगांनाही रोजगार देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.     - जी. के. वेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरjobनोकरीLabourकामगार