शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आता संशोधनातील गैरप्रकाराला बसणार आळा-डॉ.भूषण पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:59 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन  शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याला आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

संडे मुलाखत /चंद्रकांत शेळके । अहमदनगर : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन  शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याला आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. बोगस संशोधनाचे प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यावर यूजीसीने काय भूमिका घेतली?यूजीसी शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिपूर्ण प्रयत्न करत आहे. बोगस संशोधनाला आळा बसावा म्हणून आयोगाने शैक्षणिक संशोधन आणि नितीशास्त्र संघाची स्थापना केलेली आहे. देशातील सर्व सरकारी शिक्षण परिषदा, राष्ट्रीय अकादमी या संघाच्या सदस्य आहेत. या संघाकडून नियतकालिकांची जी यादी दिली आहे, त्यात प्रकाशित होणाºया संशोधनालाच ग्राह्य धरले जाणार असल्यामुळे संशोधनातील गैरप्रकाराला पूर्णपणे आळा बसेल.

गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे?प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्याबाबतचा निर्धारित कार्यक्रम  यूजीसीने ठरवून दिलेला आहे. परंतु यात राज्य सरकारचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत. त्यात केवळ यूजीसीचा पुढाकार असून चालणार नाही, तर केंद्र व राज्य सरकार  यांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवायला हवा. कौशल्याधारीत विषय कोणते? नियमानुसार यूजीसी कौशल्य विकासासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांना अनुदान देते. परंतु कौशल्य म्हणजे नुसती कारागिरी नव्हे, तर प्रत्येक विषयात कौशल्य शोधण्याची गरज आहे. उदा. बी.ए. इंग्रजीमध्येही कौशल्य आहे. ते कसे फुलवायचे व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे हे महाविद्यालायांनी ठरवले तर तो विषयही कौशल्यधारित होईल. त्यासाठी निकालावर आधारित ३० अभ्यासक्रमांची यादी यूजीसीच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. त्याचा संदर्भ विद्यापीठ, महाविद्यालयांना घेता येईल. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी केवळ ज्ञानकेंद्रित न होता रोजगारक्षमही होतील, अशी अपेक्षा. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत