शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...आता कुणावर ३०२ दाखल करायचा? : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:13 IST

राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे

अकोले : राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ‘फेकू सरकार’ घालविण्यासाठी राष्टÑवादी काँगेसच्या तरुणांनी कामाला लागावे, असे आवाहन करुन धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षणास धक्का लागू देवू नका? असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.अकोले परिसरात शनिवारी औरंगपूर फाटा येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, दिलीप शिंदे, कपील पवार, गिरजाजी जाधव, संगीता शेटे, चंद्रकला धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.देशात आणि राज्यात हुुकुमशाहीचे राज्य सुरु असल्याची टीका करीत मनुवादी विचाराचे सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी शेतकºयांच्या मुलांनी सिध्द व्हावं अशी अपेक्षा आ.पवार यांनी व्यक्त केली. त्यांचे भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता सभागृहात उभा राहून घोषणा देत असताना ‘खासदार-आमदरकीच बटण दाबेपर्यंत हा उत्साह टिकून ठेवा! नाही तर आमची पाठ फिरली की व्हा पसार..’ अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.सीताराम गायकर यांनी प्रास्ताविक तर यशवंत आभाळे यांनी सूत्रसंचालन केले. आ. शिंदे, आ. वैभव पिचड, मीनानाथ पांडे यांची भाषणे झाली. विकास शेटे यांनी आभार मानले. जेष्ठ नेते मधुकर नवले यांची राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र आ.पवार यांचे हस्ते त्यांना यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले