शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

मास्क न वापरल्यास आता २०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

अहमदनगर : आता मास्क न वापरल्यास किंवा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पाचशेऐवजी २०० रुपये दंड वसूल ...

अहमदनगर : आता मास्क न वापरल्यास किंवा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पाचशेऐवजी २०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पाचशे रुपयांच्या दंडावरून नागरिक आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नेहमीच हुज्जत होते. तसेच मास्क न वापरल्यास होणारी ५०० रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

आता २०० रुपये दंडाबाबत दिलेल्या आदेशाची सोमवार (दि. १५) पासून अंमलबजावणी होणार असून ३१ मार्चपर्यंत हा आदेश कायम राहणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी मास्क न वापरणे, थुंकणे, सामाजिक अंतर न पाळणे, धूम्रपान न करणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत आदेशाचे उल्लंघन झाल्यास ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. त्याऐवजी १५ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत पाचशेऐवजी २०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. त्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

दरम्यान, धार्मिक स्थळी संबंधित ट्रस्टने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत दक्षता घेण्याचा आदेशही देण्यात आला होता. याबाबत कार्यवाही न केल्यास सर्व खर्च संबंधित ट्रस्टकडून वसूल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.