शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

निवडणुका झाल्या आता सरपंचपद आरक्षणाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:18 IST

सुपा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवून गावकी सांभाळण्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण नेमके काय ...

सुपा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवून गावकी सांभाळण्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण नेमके काय असेल, याचा अंदाज करीत गावकारभारी जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.

पारनेर तालुक्यातील सुपा परिसर राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे. याच परिसरातील हंगा गावचे रहिवासी निलेश लंके आमदार आहेत. वाडेगव्हाण येथील गणेश शेळके पंचायत समितीचे सभापती आहेत. सुपा परिसरातून जाणाऱ्या नगर-पुणे रस्त्यामुळे गावे समृद्धीकडे वाटचाल करीत असताना १९९२ मध्ये याच भागात आलेली एमआयडीसी व आता तिच्या टप्पा- २ व टप्पा- ३ मुळे होत असणाऱ्या विस्ताराने कायापालट होणार असून त्यातून ग्रामपंचायत व सरपंच पदाभोवती निर्माण झालेले प्रतिष्ठेचे वलय यामुळे ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. आता लक्ष लागले आहे ते सरपंचपदाच्या आरक्षणाकडे. लवकरच आरक्षण निघेल मग बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागेल. त्या दिशेने जर तरचा विचार करत आपले कोणते सदस्य निवडून येतील. कुणाची कशी मदत होऊ शकते. याबाबत खलबते सुरू झाली आहेत. पूर्वतयारी करताना गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

काही जण नंतरचे नंतर बघू म्हणत सध्या काहीच ताणतणाव नको म्हणत विषय बाजूला सारताना दिसतात. सुपा परिसरात प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित सत्ताधीशाविरोधात परिवर्तनाची हाक देत बदल घडवणारी मंडळी निवडणुकीत उतरली. मतदारांनी नेमकी कुणाला साथ दिली ते आज समोर येईल. सुप्यात १५ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत एका गावच्याच मतदानाइतके एका प्रभागात मतदार होते. राजकीय पक्षाऐवजी स्थानिक गट-तट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

वाघुंडे खुर्दमध्ये सरपंचाच्या गटाला शह देण्यासाठी माजी सरपंच समर्थक तर बुद्रूकमध्ये ४ माजी सरपंच एक बाजूला व त्यांच्या स्पर्धेसाठी नवखी मंडळी रिंगणात उतरली होती. निर्मलग्राम पुरस्कार पटकावलेल्या आपधूपमध्ये विद्यमान सरपंच गटाचा सामना करण्यासाठी तीन माजी सरपंचांनी एक गट निर्माण केला. म्हसणे, बाबुर्डी, पळवे या गावातही निवडणूक चांगलीच रंगली.

सुपा गावचे सरपंचपद राजकीयदृष्ट्या वजनदार आहे. मोठा बाजार, महामार्ग, एमआयडीसी, उद्योधंद्यांची भरभराट यामुळे हे पद प्रतिष्ठेचे असून ते मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड चाललेली दिसते. हंगा, वाघुंडे खुर्द व बुद्रूक, आपधूप, पळवे, म्हसणे, बाबूर्डी व सुपा या गावच्या शिवारात एमआयडीसी असल्याने या गावच्या सरपंचाची एमआयडीसीतील कारखान्यात होणारी महत्त्वपूर्ण उठबस, प्रतिष्ठा, चार पैसे कमावण्याची जागा म्हणून पाहण्याच्या वृत्तीने ते पद महत्त्वाचे आहे. ते मिळविण्यासाठी चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे अगोदरच जुळवाजुळव केली तर गणित बिघडणार नाही, या आशेने चर्चेच्या फैरी झडताना दिसत आहेत.

---

अद्याप सरपंचपद आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यात याबाबत कार्यक्रम येईल. त्यानुसार गावोगावच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल.

-सुधाकर भोसले,

उपविभागीय अधिकारी