शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

नगर जिल्ह्यात आता २० जूननंतर पाऊस - डॉ. रवींद्र आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:50 IST

भाऊसाहेब येवले राहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. ...

भाऊसाहेब येवलेराहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र आंधळे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद!प्रश्न : मान्सूनचा सध्याचा प्रवास?डॉ. आंधळे : यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने बे्रक दिल्याचे चित्र समोर आले आहे़ येत्या चार दिवसात तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे़ वायू वादळाने मान्सूनची प्रगती थांबली आहे. कर्नाटकापर्यंत पाऊस आला आहे.प्रश्न : कधी येईल पाऊस?डॉ. आंधळे : येत्या चार दिवसात नगर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन मिलीमीटर पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे़ ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत़ येत्या आठ दिवसात तरी समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : शेतीत सध्याचे काय चित्र आहे.डॉ. आंधळे : शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती केल्या आहेत़ बियाणेही खरेदी केले आहे़ मात्र पाऊस नसल्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे़ काही शेतकºयांनी हलक्या पावसावर कपाशीची लागवड केली़ मात्र विजेचा लपंडाव व पाण्याची टंचाई यामुळे कपाशीची लागवड वाया गेली आहे़ कृषी सेवा केंद्र चालकांनी पुरेशा प्रमाणावर बियाणे खरेदी केले आहे़ मात्र बियाणाला उठाव नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात आले़प्रश्न : शेतकरी राजाची अवस्था काय आहे?डॉ. आंधळे : अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी २९४ मिली पावसाची नोंद झाली होती़ जिल्ह्यात गेल्यावर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडल्याने शेतीचे डोलारा कोसळला़ शेतकºयांवर कर्जाचा भार वाढला. तर दुसºया बाजूला सहकारी सोसायट्या व बँका धोक्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षी जूनच्या सुरूवातीला पाऊस पडला़ त्यानंतर पावसानेदडी मारली होती़ त्यामुळेगेल्यावर्षी खरीप हंगाम वाया गेला होता़ यंदा शेतकºयांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : पेरण्या कधी कराव्यात.डॉ. आंधळे : समाधानकारक पावसासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ येत्या चार दिवसात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन-चार मिलीमीटर पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो़ जून अखेरपर्यंत पेरण्या करणे शक्य आहे़ उशिरा पेरण्या करण्याचे ठरले तर उशिरा येणाºया वाणाची पेरणी करावी लागेल़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर