शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

..आता जिल्ह्यातील गुन्हेगारांची खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी गुन्हेगारांना सावध ...

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी गुन्हेगारांना सावध होण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही गुन्हेगारांची आता खैर केली जाणार नाही. पोलिसांनीही गुन्हे दाखल करताना दिरंगाई केली तर त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात हिरण यांच्या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जिल्ह्यात पूर्वी एका महिन्यात २६० गुन्हे विलंबाने दाखल होत होते. आता मात्र हे प्रमाण ८० वर आले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल न होणे ही भविष्यकाळासाठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढविले आहे. त्यात हलगर्जीपणा केलेल्या २१ पोलिसांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील वाळू तस्करीतील गुन्हेगारीवर पाटील यांनी चिंता व्यक्त केली. कोणत्याही आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांनी आता सावध व्हावे. श्रीरामपूर येथील तीन आरोपींवर मोक्काचा प्रस्ताव तयार आहे. आणखी आरोपींवरही कारवाई प्रस्तावित आहे. झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाया हाती घेण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांच्या याद्या संकेतस्थळावर संकलित करण्यात आल्या आहेत. दीड व दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गंभीर गुन्हेगारांवर कडक कारवाईची अंमलबजावणी केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.