शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

नगर शहराला आता नवीन प्रवेशद्वारे!

By admin | Updated: October 17, 2016 01:09 IST

सुदाम देशमुख , अहमदनगर नगर शहराला पूर्वी बारा वेशी होत्या. त्यातील बहुतांश वेशींची पडझड झाली आहे. दिल्लीगेट आणि माळीवाडा या वेशीबाहेर शहर वाढले आहे.

सुदाम देशमुख , अहमदनगरनगर शहराला पूर्वी बारा वेशी होत्या. त्यातील बहुतांश वेशींची पडझड झाली आहे. दिल्लीगेट आणि माळीवाडा या वेशीबाहेर शहर वाढले आहे. त्यामुळे ही प्रवेशद्वारे नावालाच आहेत. नगर शहराचे प्रवेशद्वार ही संकल्पनाच इतिहासात जमा झाली आहे. शहराचा प्रवेश नेमका कोठून सुरू होतो, याबाबत संभ्रम आहे. म्हणूनच महामार्गावर चार ठिकाणी भव्य प्रवेशद्वारे उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय महापौर सुरेखा कदम यांनी घेतला आहे. अहमदनगर शहराला पाचशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शहराला पूर्वी बारा (गेट) वेशी होत्या. या वेशीबाहेर शहराची वाढ झाली आहे. माळीवाडा आणि दिल्लीगेट या दोन वेशी सोडल्या तर नव्या पिढीला तिसऱ्या वेशीचे नावही सांगता येत नाही. शिवाय या वेशी वाहतुकीसाठी अडथळा ठरल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दिल्लीगेट स्थलांतराचा प्रस्ताव होता. मात्र त्याला ऐतिहासिक प्रेमींचा विरोध असल्याने ही कल्पना बारगळली. नगरपालिकेची महापालिका होवून तेरा वर्ष झाली आहेत. मात्र शहराची नवी ओळख होईल, असे एकही काम महापालिकेकडून झाले नाही. बाहेरच्या जिल्ह्यातून नगरमध्ये येणाऱ्यांना नगर शहर नेमके कोठून सुरू होते, याबाबत नेमका बोध होत नाही. महापालिकेची हद्द जिथे संपते, त्या ठिकाणी ही प्रवेशद्वारे उभारण्याचा निर्णय महापौर सुरेखा कदम यांनी घेतला आहे. कल्याण-विशाखापट्टणम् रोड, नगर-मनमाड रोड,नगर-पुणे रोड आणि नगर-औरंगाबाद रोड अशा तीन राज्य तर एका राष्ट्रीय महामार्गावर ही प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत. याबाबत थेट दिल्ली-मुंबईपासून ते थेट नगरपर्यंत विविध वास्तुतज्ज्ञांशी सध्या महापौर कदम चर्चा करीत आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुंचा प्रभाव या प्रवेशद्वारावर राहणार आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम आणि शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी या ऐतिहासिक कामागिरीमध्ये परिश्रम घेत आहेत.नगर शहराचे प्रवेशद्वार ही अफलातून तयार करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वारसा जपणारी आणि नव्या तंत्रज्ञानाचा आधार असा योग या वास्तुमध्ये साधला जाणार आहे. प्रवेशद्वारावर एक मोठा डिस्प्ले फलक लावण्यात येणार आहे. या फलकावर शहराच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडणार आहे. त्याशिवाय जाहिरातीमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळविण्याचा विचार आहे. आकर्षक आणि महानगराच्या धर्तीवर तयार होणारी प्रवेशद्वारे म्हणजे शहराच्या मार्केटिंगसाठी एक मोठी संधीच मिळणार आहे.