शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

उचल फिटली नाही, घरी जायचे कसे? हजारो ऊस तोडणी कारखाना कार्यक्षेत्रात मजूर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:18 IST

नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगार साखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अनिल साठे/ शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.२४ ) मंगळवारी रोजी देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव या संदर्भात जनतेला संबोधित करतांना 'तुम्ही आहे तिथेच राहा' असे सांगितले आहे. या परिस्थितीत नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगारसाखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊसतोडणी मजुरांनी मागील वर्षी राज्यातील तसेच पर राज्यातील विविध साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेतली होती. मागील वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दरम्यान ऊसतोडणीसाठी हजारो कुटुंब विविध कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरीत झाले होते. पती, पत्नी ऊस तोडायला गेली आहेत. त्यांच्यातील बहुतांश मजुरांचे वृध्द आई, वडील,लहान मुले गावीच आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यासह परराज्यातील अनेक साखर कारखाने सुरू आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड भागातील सुमारे दोन हजार ऊस तोडणी कामगार कारखाना स्थळावर कार्यरत आहेत. सदर कामगारांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने त्यांची तिथे गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक गावकरी मजुरांना किराणा सारख्या अत्यावश्यक वस्तू देण्यास व गावात येण्यास मनाई करीत असल्याने कामगारांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ‘लोकमत’शी बोलताना एका मुकादमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. येथील स्थानिक लोक आम्हाला किराणा दुकानात येण्यास मज्जाव करीत आहेत. हव्या त्या सुविधा कारखाना प्रशासनाकडून मिळत नाहीत. घेतलेली उचल अंगावर पडल्यावर आम्ही जगायचे कसे? वर्षभर मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च कसा भागणार. आम्हाला गावी यायचे म्हटले तर साधने मिळत नसल्याचे सांगितले.पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखाना स्थळावर पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील तब्बल ८० बैलगाडी आहे. इथं आम्ही २०० ते ३०० लोक आहोत. आम्हाला येथील स्थानिक लोक साधा किराणा घेण्यासाठी गावात येऊ देत नाही. कारखान्याकडून कामाची घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. त्यात आमच्या जीविताला कोरोना रोगाचा संसगार्चा धोका वाढला आहे. प्रचंड भीती वाटते. पण घेतलेल्या  उचलीचे करणार तरी काय..?, असेही ऊसतोडणी मजुरांसह मुकादमाने सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेLabourकामगार