शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नगर-मनमाड महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:44 IST

नगर- मनमाड महामार्गाचा तब्बल बारा वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. मजबुतीकरणानंतर अवघ्या चार वर्षांतच हा महामार्ग रामा इन्फ्रा कंपनीकडून सुप्रिमकडे हस्तांतरित झाला.

अण्णा नवथर ।  अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाचा तब्बल बारा वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. मजबुतीकरणानंतर अवघ्या चार वर्षांतच हा महामार्ग रामा इन्फ्रा कंपनीकडून सुप्रिमकडे हस्तांतरित झाला. परंतु, वर्षभरातच याही कंपनीने अंग काढून घेतले. त्यामुळे मनमाड महामार्गाची पुरती फरपट झाली आहे. रस्ता कमी आणि खड्डे जास्त, अशी दयनीय अवस्था मनमाड महामार्गाची झाली आहे़. नगर- मनमाड हा जिल्ह्यातील महत्वाचा महामार्ग आहे. सोलापूरमार्गे येणारी अवजड वाहने या मार्गावरून ये- जा करतात़. हा महामार्ग पूर्वी अरुंद होता़. त्याची रुंदी वाढविली गेली़. नगर ते कोल्हार या मार्गावर  ३५ कि़मीचा रस्ता हा खड्ड्यांचा आहे. हा महामार्ग बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर रामा इंन्फ्रा कंपनीला दिला गेला. सन २००७ ते २०१० या काळात रामा इंन्फ्रा कंपनीने टोल वसूल केला. परंतु, उर्वरित २ टक्के काम पूर्ण न केल्याने या कंपनीचा टोल बंद करण्यात आला. या कंपनीने बँकेकडून कर्ज घेतलेले होते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी बँकांनी एकत्र येऊन नवीन विकासक नेमला़ जानेवारी २०१८ मध्ये सुप्रिम कंपनीची विकासक म्हणून नेमणूक झाली. परंतु ही कंपनीही फार काळ टिकली नाही. डिसेंबर २०१८ मध्ये याही कंपनीचा टोल बंद करण्यात आला. या कंपनीने शासनाच्याविरोधात याचिका दाखल केली़ हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हा महामार्ग पुन्हा जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे आला.  शासनाने कार व जीप ही दोन वाहने टोल वसुलीतून वगळली. त्याबदल्यात शासनाकडून विकासकांना निधी दिला जातो. हा निधी जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे होता. या निधीतून मनमाड महामार्ग दुरुस्त करण्यात येत असून, हा निधीही तोकडा आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी नव्याने प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यावर शासनाकडून काय निर्णय होतो, त्यावरच या महामार्गाचे भवितव्य अवलंबून आहे.

 मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा जागतिक बँक प्रकल्प विभागाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे जागतिक बँकेचे प्रकल्प अधिकारी राजगुरु यांनी सांगितले.

 खड्डे दुरुस्ती का होत नाही.सुप्रिम कंपनीचा टोल बंद केल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याचा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला. प्रशासनाने कार व जीपच्या बदल्यात मिळणा-या अनुदानातून डांबरीकरणाचा जून २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश दिला़. संबंधित ठेकेदाराने राहुरी येथून काम सुरूही केले होते. परंतु, खड्डे बुजविण्याचाच खर्च अधिक असल्याने त्यांनीही काम सोडले. तेव्हापासून हे काम रखडले असून, पावसाळ्यात आणखी खड्डे पडले. त्यामुळे जागतिक बँकेच्या अधिका-यांवर टीका होऊ लागल्याने अधिका-यांनी मुरुम टाकून खड्डे बुजविले. परंतु, मुरुमामुळे धूळ झाली़ खड्डे बुजविण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव या विभागाने तयार केला आहे. पण, त्यासाठी पैसे कोण देणार हा प्रश्नही होताच. तो खासदार डॉ़. सुजय विखे यांच्या बैठकीत सोडविण्यात आला़.     

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा