शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही अकरावी प्रवेशाची चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. ...

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. यात ९९.९७ टक्क्यांच्या सरासरीने ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, नगर जिल्ह्यात अकरावीसाठी अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयंसिद्ध अकरावीच्या ९४० तुकड्यांमध्ये ७६ हजार ६०० जागा आहेत. यामुळे यंदा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना चिंता नसून अकरावीत सहज प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्षी (२०२०-२१) नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.१० टक्के लागून ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्या वेळीही अकरावीच्या ७६ हजार जागा होत्या.

यंदाही जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहायित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ६०० आहे. त्या तुलनेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार ५६६ आहे. त्यामुळे सर्वांना सहज प्रवेश मिळणार आहे.

--------------

सीईटीने मिळणार नामांकित महाविद्यालय

यंदा दहावीच्या परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असून, २१ ॲागस्टला या परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. जे परीक्षा देतील त्या गुणांवर त्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळेल. जे परीक्षा देणार नाहीत, त्यांना सीईटीचे प्रवेश झाल्यानंतर उर्वरित जागांवर दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळतील.

---------------

४४ टक्के जागा विज्ञान शाखेसाठी

नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ४४ टक्के जागा (३४ हजार) विज्ञानसाठी राखीव आहेत. तर कला शाखेसाठी २९ हजार ६०० जागा असून, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी आहेत.