शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

आदिवासी संशोधन केंद्र पुण्यात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST

झिरवळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी विधानपरिषदेच्या बारा जागांची नियुक्ती अडकून ठेवली आहे. निकष शोधले जात आहेत. आकस की आणखी ...

झिरवळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी विधानपरिषदेच्या बारा जागांची नियुक्ती अडकून ठेवली आहे. निकष शोधले जात आहेत. आकस की आणखी काही राजकरण सांगता येत नाही ? राज्यातील तीन पक्षांच्या भावकीत अंतर येणार नाही, सरकार पाच वर्षे टिकेल. कायदा करून दारूबंदी यशस्वी होतेच असे नाही,

कायद्याला पळवाटा आहेत, दारुबंदीसाठी प्रबोधन महत्वाचे आहे. आदिवासीसाठी बजेट वाटा ९.३५ टक्के आहे. पूर्वी आदिवासी विभागाचा प्रशासकीय खर्च जनरल बजेटमधून व्हायचा आता आदिवासींच्या बजेटमधून तो केला जात असल्याने आदिवासी विकास कामांचा निधी वर्षाला २००० कोटींनी कमी झाला आहे. आदिवासी आश्रम शाळेत ५५ टक्के शिक्षक नाहीत. ४५०० तासिका शिक्षक आहेत. १५ वर्षे काम करणारांना नोकरीत कायम केले पाहिजे. नोकरीत बॅकडोअर इन्ट्री बंद व्हावी. आदिवासी विभागात नोकरीतील अनेक पदे रिक्त ते भरले पाहिजे.

खावटी अनुदान यंदा दिले गेली नाही. खावटी साठीचे निकष बदलायला हवे. बालविवाह थांबण्यासाठी शिक्षण व सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे आहे. शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग व बजेट असायला हवे. आदिवासी समाजाने शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना आपल्या लोककला संस्कृतीचेही जतन करणे काळाची गरज आहे.

अकोलेत आलो माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेण्याची इच्छा होती. तिघांचीही भेट झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे सन्मान केला. तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते.