शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही महामार्गांना केंद्राचा निधी श्रेयासाठी कोणीही धडपडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

कर्जत : अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत. या कामांचे श्रेय घेण्यासाठी इतरांनी ...

कर्जत : अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत. या कामांचे श्रेय घेण्यासाठी इतरांनी धडपड करू नये, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी कर्जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बाेलत होते.

विखे म्हणाले, अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले आहे. हे दोन्ही रस्ते फोर लेनचे (चार पदरी) होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील ही कामे आहेत. यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राज्य सरकारची एक दमडीही या कामासाठी नाही. हे कटू सत्य असतानाही काही विद्वान मंडळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबाबरोबर कसले तरी निवेदन देतांनाचा फोटो काढतात आणि ही कामे मीच मंजूर करून आणली असा देखावा करत आहेत, अशी टीका विखे यांनी केली. लवकरच या दोन्ही कामांचा प्रारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माहिजळगाव येथे होणार आहे, अशी घोषणा विखे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दिवाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, उपसरपंच पप्पू धोदाड, शेखर खरमरे आदी उपस्थित होते.

----

३७५ कोटींची नुकसान भरपाई

दोन्ही रस्त्यांसाठी जे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहेत. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना ३५७ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यापैकी २२२ कोटी रुपये प्रांत अधिकारी कार्यालयाकडे जमा केलेले आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मिरजगाव व माहिजळगाव येथे बायपास रस्ते होणार आहेत.

----

प्रांताधिकाऱ्यांबाबत तक्रारी...

अहमदनगर-टेंभुर्णी व श्रीगोंदा-जामखेड या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींची शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत वकील बाळासाहेब शिंदे व दादासाहेब सोनमाळी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी विखेंकडे तक्रारी केल्या. त्यावर येत्या पंधरा दिवसात सर्व नोटिसा काढून प्रक्रिया पूर्ण करू, असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी स्पष्ट केले.

---

१० कर्जत विखे

कर्जत येथील बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे. समवेत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, गटविकास अधिकारी अमोल जाधव.