शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:57 IST

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

                  यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे             गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये       भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८ 

--------------------------------------(भज गोविन्दम-८) ....................................................

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्य$ंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या. प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत. इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते.  आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही.

हजारो वषापूर्वी इजिप्तमध्ये पिºयामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती. त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे. त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिºयामीड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंतच लोक या देहाला जपतात. नंतर कोणीही विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे. 

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपले कोणी नाही. 

या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही. फक्त आपले आहेत, असे भासते. श्री संत ज्ञानोबाराय  म्हणतात, मातापिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।   एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी॥ धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारीअंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही. फक्त एक सद्गुरूच वाचवितात. म्हणजे ते काही जीवंत करीत नाहीत. पण मृत्यू सुकर करतात. या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना सुद्धा दुख: होत नाही. उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही.

श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात,

हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा, वरी चर्म घातलें रे, कर्म कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा. बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडूनियां योगी गेले वनवासा

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की, मानवी जीवन हे किती पराधीन आहे. पैसा, धन, द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. नव्हे जर कोरोना झालाय एव्हढे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर जाळून टाकतात. 

नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी 

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम ,चिचोंडी (पाटील) ता. नगर मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक