शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:57 IST

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

                  यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे             गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये       भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८ 

--------------------------------------(भज गोविन्दम-८) ....................................................

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्य$ंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या. प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत. इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते.  आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही.

हजारो वषापूर्वी इजिप्तमध्ये पिºयामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती. त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे. त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिºयामीड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंतच लोक या देहाला जपतात. नंतर कोणीही विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे. 

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपले कोणी नाही. 

या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही. फक्त आपले आहेत, असे भासते. श्री संत ज्ञानोबाराय  म्हणतात, मातापिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।   एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी॥ धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारीअंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही. फक्त एक सद्गुरूच वाचवितात. म्हणजे ते काही जीवंत करीत नाहीत. पण मृत्यू सुकर करतात. या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना सुद्धा दुख: होत नाही. उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही.

श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात,

हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा, वरी चर्म घातलें रे, कर्म कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा. बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडूनियां योगी गेले वनवासा

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की, मानवी जीवन हे किती पराधीन आहे. पैसा, धन, द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. नव्हे जर कोरोना झालाय एव्हढे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर जाळून टाकतात. 

नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी 

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम ,चिचोंडी (पाटील) ता. नगर मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक