शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:57 IST

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

                  यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे             गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये       भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८ 

--------------------------------------(भज गोविन्दम-८) ....................................................

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्य$ंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या. प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत. इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते.  आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही.

हजारो वषापूर्वी इजिप्तमध्ये पिºयामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती. त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे. त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिºयामीड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंतच लोक या देहाला जपतात. नंतर कोणीही विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे. 

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपले कोणी नाही. 

या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही. फक्त आपले आहेत, असे भासते. श्री संत ज्ञानोबाराय  म्हणतात, मातापिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।   एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी॥ धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारीअंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही. फक्त एक सद्गुरूच वाचवितात. म्हणजे ते काही जीवंत करीत नाहीत. पण मृत्यू सुकर करतात. या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना सुद्धा दुख: होत नाही. उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही.

श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात,

हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा, वरी चर्म घातलें रे, कर्म कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा. बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडूनियां योगी गेले वनवासा

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की, मानवी जीवन हे किती पराधीन आहे. पैसा, धन, द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. नव्हे जर कोरोना झालाय एव्हढे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर जाळून टाकतात. 

नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी 

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम ,चिचोंडी (पाटील) ता. नगर मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक