शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कालव्यांना नाही, गोदावरीत पाणी सोडल्याने नागरिक संतप्त

By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 13, 2024 14:21 IST

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अ

कोपरगाव (जि. अहमदनगर) : नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह कोपरगाव शहरवासीय संतप्त झाले आहेत. शहराला बारा दिवसांआड पाणी मिळते आहे, तर पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंश सुटला असता. गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अनेकांच्या बोअरवेल व वहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्यांना पिणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू केल्याची भावना निर्माण झाली आहे.

नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून कोपरगाव शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करतो.

-सुनिल अंबादास देवकर, माजी सभापती, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर