शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरणामुळे पुराची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

अकोले : निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. म्हणून तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ...

अकोले : निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. म्हणून तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

निळवंडे धरण निर्मितीच्या पूर्वी तालुक्याने प्रवरा नदीचे पूर अनुभवले आहे. १९६८-६९ साली प्रवरेला पूर आला होता. तालुक्यातील रुंभोडी गावात पाणी शिरले होते. अकोलेतील मोठ्या पुलाला पाणी लागले होते. संगमनेर शहरात पाणी शिरले होते. त्यानंतर, अनेकदा प्रवरेचा पूर अकोलेकरांनी अनुभवले. प्रवरा नदीवर ८.३२ टीएमसीचे निळवंडे धरण साकारले. २००८ला धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून प्रवरेचा पूर तालुक्याने पाहिला नाही. रंधा, चितळवेढे, कळस येथे प्रवरेवर उंच पूल झाल्याने वाहतूक ठप्प होणे बंद झाले. भंडारदरा व निळवंडे मिळवून १९.३२ टीएमसी पाणी अडविले जात असल्याने अचानक पूर येण्याची शक्यता आता राहिली नाही.

सह्याद्रीच्या काळ्या पाषाण खडकावर तालुक्यातील गावे वसलेली असल्याने भूकंपाचा धोका कमी आहे. जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

तालुक्यात १९१ गावे असून, मुळा खोऱ्यात १२ ते १५ हजार क्यूसेकने पाऊस पाण्याचा विसर्ग आल्यास थोड्या-फार प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. प्रवरा नदी पात्रातून ४९ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला, तरच पूर परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती गेल्या १३ वर्षांत झालेली नाही. प्रवरा पट्ट्यात ४९ गावे पूररेषेत असून, त्यापैकी १६ गावे २५० लोकसंख्या पूरबाधित होऊ शकतात. तालुक्यात सरासरी ३३६ मिमी पाऊस पडतो. घाटघर, रतनवाडी येथे साडेतीन-चार हजार मिलीमीटर पाऊस होतो, पण काही पाणी कोकणात वाहून जाते.

...........

धोकादायक परिस्थिती नाही

आढळा खोरे बहुतांशी पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने, या भागात शक्यतो पूरपरिस्थिती निर्माण होत नाही. तालुक्यात सह्यादीच्या पर्वत रांगा असून, २०१६ मध्ये फोपसंडी येथे दरड कोसळली होती. २०१७ मध्ये अंबित येथे जमिनीला भेग पडली होती, मात्र, ती धोकादायक नव्हती, असा निर्वाळा भूगर्भ व खगोल शास्त्रज्ञांनी दिला आहे, तरीही तशी काही परिस्थिती निर्माण झाली, तर काही तासांतच शासकीय आश्रमशाळेमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.

............

भूकंप, जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरीही अकोले तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज आहे.

- तहसीलदार मुकेश कांबळे