शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरण भरले; दहा हजार क्यूसेकने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

राजूर : भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही भरले असून, सोमवारी निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले ...

राजूर : भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही भरले असून, सोमवारी निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाळ्यात प्रथमच प्रवरामाई दुथडी भरून वाहू लागली आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले होते. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी निळवंडे धरणात पोहोचल्याने सोमवारी दुपारी निळवंडे धरणही भरले. या धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी दीडनंतर या धरणाच्या वक्र दरवाजांमधून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, तर वीजनिर्मितीसाठी ६८५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक विचारात घेता सायंकाळी विसर्गात मोठी वाढ करीत दहा हजार ७५६ क्यूसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सांगितले. दरम्यान, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवून नऊ हजार ८९२ क्यूसेक करण्यात आला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे रविवारी भंडारदरा धरण भरले आणि या धरणातून सात हजार ७४४ कूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या पाण्याबरोबरच निळवंडे पाणलोट क्षेत्रातील ओढे नालेही दुथडी भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी निळवंडे जलाशयात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या धरणातील पाणीसाठा ९४ टक्के म्हणजेच सात हजार ७३१ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला आणि धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे जाहीर करीत या धरणाच्या वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या धरणातील विसर्ग तीन हजार ३६० क्यूसेक इतका होता. मात्र धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तीन तासांनंतर या विसर्गात वाढ करत सायंकाळी ५ वाजता तो आठ हजार १४४ क्यूसेक इतका करण्यात आला. दरम्यान, भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविण्यात आलेला होता. त्यामुळे निळवंडेकडील पाणी आवक लक्षात घेता सायंकाळी ७ वाजता निळवंडे धरणातून दहा हजार ७५६ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला.

सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे सुमारे आठ इंच म्हणजेच १९५ मिमी पावसाची नोंद झाली, तर घाटघर येथे १३४ मिमी, पांजरे येथे १३५ मिमी, भंडारदरा येथे १३३ मिमी, वाकी येथे १२३ मिमी पावसाची नोंद झाली.