शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

निळवंडेची कालवे खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:27 IST

बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली.

अकोले : बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला.मंगळवारी (दि.११) मंत्रालयात झालेल्या चर्चेनुसार निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पोलीस बंदोबस्तासह कालवे खोदण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत निळवंडेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायथ्या-पासून ‘खोंडवस्ती ते तिटमेवस्तीपर्यंत’ तीन किलोमीटरपर्यंतचे कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर होते. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील भूईमूग, वालवडसारखी पिके काढून घेतली. ऊस चाºयासाठी कापून नेला आणि प्रशासनाला सहकार्य केले.शेतकऱ्यांचा जवळपास सर्व विरोध मावळल्याचे चित्र होते. गेली दोन, चार दिवस निळवंडे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राखीव दलाचे १०० जवान तसेच स्थानिक पोलीस बुधवारपर्यंत होते. मुंबई येथे मंगळवारी अकोलेतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समजते.बुधवारी पाटबंधारे-जलसंपदाच्या अधिकाºयांनी दोन पोकलेन, चार टिपर, डंपर, जेसीबी आदींसह कालवे खोदाईच्या कामाला गती दिली. कृषी विभागाचे अधिकारी एल. एन. नवले व त्यांच्या सहकाºयांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पंचनामे केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दिवसभर निळवंडे धरण परिसरात थांबून होते.आमची खोंड कुटुंबाची ३५ खातेदारांची ११ एकर जमीन वीजनिर्मिती गृहासाठी संपादित केली आहे. त्याचा काही मोबदला मिळणे बाकी आहे. सध्या शेतात भूईमूगाचे पीक आहे. काही पीक घाईने काढले. काहीवर पोकलेन फिरला. त्यावर जेसीबीने कालव्याची माती पडली. हे पाहून दु:ख झाले पण दुसरीकडे कुणीतरी या पाण्यातून उभे राहिल, त्यांचा प्रपंच फुलेल याचाही आनंद आहे. -शरद खोंड, प्रकल्पग्रस्त शेतकरीखोंड कुटुंबाची ११ एकर जमीन संपादित केली आहे. नियमानुसार त्यांना मोबदला दिला जाईल. कालवेग्रस्तांचे उर्वरित प्रश्नही मार्गी लावू. कालवेग्रस्त शेतकºयांचा विरोध मावळला आहे. कालवे खोदाईचे काम सुरळीत सुरू आहे. आवश्यक तितकीच जमीन सध्या रेखांकित केली आहे. कालवे तयार होऊन उरणारी जमीन शेतीच्या मूळ मालकाला भाडेतत्त्वावर कसण्यासाठी देण्याचा शासनाचा विचार आहे. -डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले