शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कुकडी आवर्तनाचा निर्णय होणार पुढील आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:11 IST

पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदा : पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नेमके किती पाणी लागेल याचा वास्तव आढावा घेऊन मागणी करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आली. बैठकीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार दिलीप वळसे, आमदार राहुल जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार शरद सोनवणे, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घोड गंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे उपस्थित होतेगेल्या आवर्तनात पिण्यासाठी किती पाणी दिले गेले, त्यामधील किती पाणी शिल्लक आहे. कोणत्या तलावावर पिण्याचे टँकर भरण्याची व्यवस्था आहे. कोणत्या तलावावर ग्रामपंचायतीची थेट पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. चार दिवसात पुणे व नगर येथे गिरीश बापट व राम शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन पाण्याच्या पाण्याची मागणी करण्यात येणार आहे.पिण्याच्या पाण्यावर शेतीचे आवर्तनपिण्याच्या पाण्यासाठी नगर व पुणे जिल्हाधिकारी किती मागणी करतात. त्यानंतर धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहते. यावर शेतीचे आवर्तन अवलंबून राहणार आहे.कुकडी आवर्तनावर प्रश्नचिन्हकुकडी प्रकल्पात 29% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी कि शेतीसाठी सोडायचे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत फळबागांना १ मार्च दरम्यान फळबागांना पाणी देता येऊ शकते. पण त्यासाठी डिंभे, माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याचा येडगाव धरणात एकत्रीत मेळ घालून निर्णय घेतला तर आवर्तन देता येऊ शकते. पण त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधार घेऊन राजकिय प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा