शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक

By admin | Updated: July 17, 2014 00:30 IST

अकोले : मोसमी पावसाला तालुक्याचा घाटमाथा ओलांडण्यास तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली असून मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेवटच्या चरणात पुनर्वसू नक्षत्र बरसू लागले आहे.

अकोले : मोसमी पावसाला तालुक्याचा घाटमाथा ओलांडण्यास तब्बल महिनाभर वाट पाहावी लागली असून मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेवटच्या चरणात पुनर्वसू नक्षत्र बरसू लागले आहे. मंगळवारी घाटघरला साडेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत २२० दलघफू नव्या पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. बुधवारी १२ तासांत १२ मिलीमिटर पाऊस पडला. दुपारनंतर पाऊस थंडावला होता.तालुक्यात सर्वदूर पावसाचे वातावरण असून पूनर्वसू नक्षत्र रिमझिम सरींनी बरसले. पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर होता, मात्र पूर्व भागात बुरबूर होती. पाऊस पडता झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, भात आवणीसाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. काही भागात भात रोपांना पावसाने जीवदान दिले असले तरी आता गरवा वाण भात लावून उत्पादन घटणार आहे. हळवा वाण भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कुमशेत, रतनवाडी, आंबीत, घाटघर भागात काही अंशी भात आवणीला सुरुवात झाली असल्याचे कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. मंगळवारी घाटघरला १३९, रतनवाडी- ८५, पांजरे- ३१, वाकी- २८, भंडारदरा- २२, कोतूळ- ६, निळवंडे- ५ मिमी पाऊस पडला. मात्र अकोले, देवठाणमधे पाऊस मोजणी यंत्राचा आकडा निरंक होता. भंडारदरा धरणात ८१९, तर निळवंडेत ४८५ दलघफू पाणीसाठा असून निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरु आहे. आंबीत तलाव ओसंडून वाहत असून बलठण, कोथळे, देवहंडी तलावांत मृतसाठ्याइतके पाणी आहे. पिंपळगाव खांड प्रकल्पात ७५ दलघफू पाणी अडवले गेले आहे. मुळा नदीपात्रातून २ हजार ५०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. गतवर्षी १६ जुलैला भंडारदरा निम्मे भरले होते. घाटघर परिसरातील वीज गाजब झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)