शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यांपासून सुरू होणार असून, उर्वरित पहिल्या टप्प्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. तसा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी साेमवारी काढला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकांना स्थगिती होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आहे. ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती, आशा संस्था वगळता उर्वरित विकास संस्थांच्या मतदार नव्याने तयार करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झालेली. या संस्था वगळून उर्वरित संस्थांच्या मतदारयाद्या ३१ ऑगस्ट २०२१च्या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील आशा संस्थांची संख्या १०८ असून, या संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या संस्थांची ८८८ इतकी असून, पहिल्या टप्प्यात १५६ संस्था निवडणुकीस पात्र ठरल्या होत्या. यापैकी ४८ संस्थांच्या सभासदांकडून नामनिर्देशन पत्रही मागविण्यात आले होते. या संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत होती. असे असतानाच निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे ४८ संस्थांच्या सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

थकबाकीदारांना मिळणार संधी

विकास संस्थांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मतदारयादीत अपात्र ठरलेले थकबाकीदार नवीन यादी तयार करताना पात्र ठरू शकतात. दोन वर्षांत जे सभासद कर्जमुक्त झाले आहेत, अशा सभासदांना मतदान करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.