शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

जिल्ह्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यांपासून सुरू होणार असून, उर्वरित पहिल्या टप्प्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. तसा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी साेमवारी काढला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकांना स्थगिती होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आहे. ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती, आशा संस्था वगळता उर्वरित विकास संस्थांच्या मतदार नव्याने तयार करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झालेली. या संस्था वगळून उर्वरित संस्थांच्या मतदारयाद्या ३१ ऑगस्ट २०२१च्या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील आशा संस्थांची संख्या १०८ असून, या संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या संस्थांची ८८८ इतकी असून, पहिल्या टप्प्यात १५६ संस्था निवडणुकीस पात्र ठरल्या होत्या. यापैकी ४८ संस्थांच्या सभासदांकडून नामनिर्देशन पत्रही मागविण्यात आले होते. या संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत होती. असे असतानाच निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे ४८ संस्थांच्या सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

थकबाकीदारांना मिळणार संधी

विकास संस्थांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मतदारयादीत अपात्र ठरलेले थकबाकीदार नवीन यादी तयार करताना पात्र ठरू शकतात. दोन वर्षांत जे सभासद कर्जमुक्त झाले आहेत, अशा सभासदांना मतदान करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.