शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यांपासून सुरू होणार असून, उर्वरित पहिल्या टप्प्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. तसा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी साेमवारी काढला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकांना स्थगिती होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आहे. ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती, आशा संस्था वगळता उर्वरित विकास संस्थांच्या मतदार नव्याने तयार करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झालेली. या संस्था वगळून उर्वरित संस्थांच्या मतदारयाद्या ३१ ऑगस्ट २०२१च्या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील आशा संस्थांची संख्या १०८ असून, या संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या संस्थांची ८८८ इतकी असून, पहिल्या टप्प्यात १५६ संस्था निवडणुकीस पात्र ठरल्या होत्या. यापैकी ४८ संस्थांच्या सभासदांकडून नामनिर्देशन पत्रही मागविण्यात आले होते. या संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत होती. असे असतानाच निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे ४८ संस्थांच्या सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

थकबाकीदारांना मिळणार संधी

विकास संस्थांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मतदारयादीत अपात्र ठरलेले थकबाकीदार नवीन यादी तयार करताना पात्र ठरू शकतात. दोन वर्षांत जे सभासद कर्जमुक्त झाले आहेत, अशा सभासदांना मतदान करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.